काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. यामध्ये त्यांनी अनेक मोठमोठे दावे केले आहेत. नुकतेच मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “नरकातला स्वर्ग या माझ्या पुस्तकाची एक प्रत मी राज ठाकरे यांनादेखील पाठवली आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील याची एक प्रत पाठवली आहे.” अशी माहिती त्यांनी दिल्ली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना या पुस्तकाची प्रत का पाठवली? याबाबत स्वतः माहिती दिली आहे. (Sanjay Raut Shivsena UBT send copy of Narktala Swarg book to DCM Eknath Shinde)
खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. अनेकांना या पुस्तकाच्या प्रति पाठवल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना व्यक्तिगत पत्र लिहून हे पुस्तक पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांनाही हे पुस्तक पाठवले आहे. माणसाने संकट काळात पळून न जाता कसे आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि लढायला पाहिजे हे त्यांनी यातून शिकावे. देवेंद्र फडणवीस यांनाही हे बालसाहित्य पाठवले आहे. जे ईडीला घाबरून भाजप, शिंदे गटात किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना हे पुस्तक पाठवलेले आहे” असे म्हणत त्यांनी शिवसेना उबाठाला विरोध करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
संजय राऊतांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला टोला
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. आम्हाला तीनदा पुस्तक छापावे लागले. दहा दिवसांमध्ये पुस्तक तीन वेळा छापावे लागले हा मराठी पुस्तकांच्या बाबतीत विक्रमी प्रसंग आहे. ऍमेझॉनवर पहिल्या क्रमांकावर चाललेले पुस्तक असून अजूनही देशातून, महाराष्ट्रातून याची मागणी होत आहे. या पुस्तकाचे इंग्रजी अनुकरण जुलै महिन्यामध्ये दिल्लीत प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “दिल्लीत गेल्यानंतर हे पुस्तक प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देता येईल याचीही व्यवस्था आम्ही करू. त्यांच्यासाठीच हे पुस्तक हिंदी तसेच इंग्रजीमध्ये अनुवाद करत आहोत. या पुस्तकाचा जो गाभा आहे, आत्मा आहे तो देशभरात पोहोचला पाहिजे. याचे कारण असे आहे की, ज्या पद्धतीने सगळ्या विरोधकांवर अन्याय केला गेला आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले. मी, दिल्लीत संजय सिंह, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना फार त्रास दिला हे जनतेला कळायला हवे. एवढे