ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ही एक राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, (Aditi Tatkare) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ या योजनेत न बसणाऱ्या महिला देखील घेताना दिसून येत आहेत, शासनानं मोठा निर्णय या संदर्भात आता घेतला आहे.
लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे, या योजनेच्या अटींमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांचा अर्ज बाद ठरवला जात आहे, या योजनेतून त्यांना वगळण्यात येत आहे. अनेक महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असताना तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असताना देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं आहे.
या अटींपेक्षा जास्त काही ज्या महिलांच्या घरी आहे या योजेनेतून त्या महिलांची नावं वगळण्यात येत आहेत. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील धक्कादायक म्हणजे चक्क या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते.
या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे. असा ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.