17.9 C
New York

Mumbai to Malvan boat service : मुंबई ते मालवण आता फक्त ४ तासांत; कोकणात जाण्याचा नवा सुपरफास्ट मार्ग!

Published:

कोकणात (Kokan) गणपतीच्या काळात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षी गणपतीसाठी (Ganpati २०२५) कोकणात जाणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीटांची टंचाई आणि महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता मुंबईहून मालवण आणि रत्नागिरीकडे जाण्यासाठी जलमार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार तासांत या नव्या मार्गामुळे मालवण गाठता येणार आहे. (Mumbai to Malvan boat service)

Mumbai to Malvan boat service कोकणात जाण्यासाठी जलवाहतुकीचा नवा मार्ग

मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या पुढाकाराने ‘एम टू एम’ नावाची हायटेक बोट सेवा २५ मेपासून मुंबईतील भाऊचा धक्का येथून सुरू होणार आहे. या सेवेमुळे चाकरमान्यांना साडेचार तासांत मालवण आणि विजयदुर्ग तर केवळ तीन तासांत रत्नागिरी गाठणे शक्य होईल. ही सेवा माझगाव डॉकहून सुरू होईल आणि अत्याधुनिक बोटीच्या सहाय्याने प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायक ठरणार आहे. ही सेवा सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चालवली जाणार असून लवकरच तिकीट दर जाहीर करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना हे दर परवडणारे असतील. मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai to Malvan boat service कशेडी घाटातील बोगदाही खुला – रस्ते प्रवासही सुलभ :

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर ते खेडदरम्यान कशेडी घाटातील (Kashedi Ghat) दुसऱ्या बोगद्यातही १५ मेपासून वीजपुरवठा सुरू झाल्याने तो वाहतुकीसाठी पूर्णतः खुला झाला आहे. जवळपास दोन किलोमीटर लांबीचा हा बोगदा आणि त्यास जोडणारे रस्ते एकूण नऊ किलोमीटरचे असून, यामुळे रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडपर्यंतचा प्रवास केवळ १०-१५ मिनिटांत शक्य होतो. ४०-४५ मिनिटांचा वळसा यापूर्वी याच प्रवासासाठी घ्यावा लागत होता. (Mumbai to Malvan boat service) हा बोगदा सुरळीत सुरू झाल्याने अधिक जलद आणि सुरक्षित रस्त्यावरील प्रवासही आता बनणार आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी जलमार्गासोबतच त्यामुळे महामार्गावरील ही सुधारणा देखील वरदान ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img