24.2 C
New York

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत 26 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

Published:

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात डीआरजी सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये (Chhattisgarh)  झालेल्या चकमकीत 26 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी बुधवारी नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली. त्यांनी असेही म्हटले आहे की या चकमकीत काही मोठे नक्षलवादी मारले गेले आहेत. तर, या कारवाईदरम्यान एक जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तर एका जवान या कारवाईवेळी शहीद झाल्याचे छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेची बोलताना सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यातील जंगली अबुझमद भागात नक्षलविरोधी एक मोठी मोहीम सुरू होती, जिथे नक्षलवादी आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवानांमध्ये चकमक झाली. यात 26 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, ठार झालेल्या नक्षलींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आ ठिकाणी जवानांकडून सर्च ऑपरेशन राबविले जात आहे.

Chhattisgarh  अनेक बडे नक्षलवादी ठार

अबुझहमद चकमकीत आतापर्यंत 26 हून अधिक नक्षलवादी मारले गेले असून, यात नक्षलवादी लीडर नंबाला केशव राव उर्फ ​​बसव राज याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. बसव राजवर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते आणि तो नक्षलवाद्यांचा सरचिटणीस होता. बसवराजचा देशभरातील सुरक्षा एजन्सी कसून शोध घेत होत्या, ज्याला आता डीआरजी दलांनी ठार मारले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img