20.2 C
New York

Nitesh Rane : कोणकोणाच्या बॅट घशात घालतो, ते 23 नंतर समजेल ; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Published:

महायुतीचे उमेदवार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. नितेश राणे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं, अशी मागणी केलीय. पण त्यांनी त्यापूर्वी नवीन बॉस राहुल गांधी यांना विचारलंय का? राहुल गांधींनी डोळे वटारले, तर स्टेजवर उद्धव ठाकरेंना खुर्ची मिळणार नाही.हिंमत असेल तर राहुल गांधी जवळ जा, त्यांना वीर सावरकरांची माफी मागायला लावा. आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देणार किंवा मागणी करणार, असे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात छापण्याची हिंमत हे उबाठा सेनेचे लोकं करु शकतात का? असं नितेश राणे यांनी विचारलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांची टोपी घालतात, असा जो काही शोध संजय राऊतने लावलाय. त्याचा एक तरी फोटो दाखवावा. तुझ्या मालकाचं धर्मांतर झालं तसं सर्वांना समजतोस का? तुझ्या मालकाच्या स्वागताच्या वेळी अल्ला हू अकबर, (Assembly Election 2024) पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतात. लवकरच तुझा मालक मशीदमध्ये नमाज पडताना दिसेल, अशी टीका नितेश राणेंनी केलीय. जेव्हा अमित शाहा उद्धव ठाकरेंना भेटायला यायचे, मान सन्मान द्यायचे तो तुम्हाला घेता आला नाही. अमित शाहा वाईट असतील तर रश्मी वहिनी आणि त्यांचा मुलगा आदित्य खाजगी विमानाने दिल्लीला कोणाला भेटायला गेलेले ? मिठाला न जागणारे नमक हराम म्हणजे संजय राऊत आहे, अशी टीका त्यांनी केलीय.

वसंत मोरे तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ…; जयंत पाटलांनी दिली भरसभेत ऑफर

370 कलम हटवून काय फरक पडला, ते जम्मूमध्ये जाऊन बघा. तिकडे तिरंगा फडकतोय, ते केवळ आमच्या सरकारने करुन दाखवलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जतन करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह करतात, जे त्यांच्या मुलाला जमलं नाही. बाळासाहेबांची प्रत्येक इच्छा नरेंद्र मोदी आणि अमित शाह पूर्ण करत आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यापासून हिंदुहृदय सम्राट नाव लावायला घाबरतात. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना नाही, असा टोला राणेंनी लगावला आहे. 2019 ला जनतेने युतीसाठी मतदान केलं मात्र हिंदुत्वशी बेईमानी करुन राजकारण चिखलमय करण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. ठाकरे गटाचे भविष्य अंधारात आहे. बाळासाहेबांचे खरे मानसपुत्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं राणे म्हणालेत.

जय शाहामुळे भारताचे क्रिकेट मध्ये नाव होतं आहे, चांगल्याले चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे. कोणकोणाच्या बॅट घशात घालतो, ते 23 नंतर समजेल. राऊत बुकी आहे, मॅच फिक्सिंग करतात असा आरोप राणेंनी केलाय. कुठलाही सर्वे आला तरी 23 तारीखला महायुतीचे सरकार येतं आहे. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. राज्यातील जनतेपेक्षा कोणीही चांगला सर्वे करू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत. राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचे सगळे गुण आहेत. उद्धव ठाकरे स्वतःच्या भावाचे होऊ शकले नाही, ते राज्य काय सांभाळणार ? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहणे बंद करावं, असं देखील राणे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img