20.4 C
New York

Sanjay Raut : …त्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केले सरकारचे कौतुक, पण…

Published:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सातत्याने भाजपसह विरोधी पक्षांवर निशाणा साधत असतात. पण, बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचे कौतुक केले. एरवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण, नुकतेच सरकारने ब्रिटिशांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पदवी भारतात आणणार असल्याचे जाहीर केले.

यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारचे कौतुक केले आहे. “वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती, ती सरकार पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न करत असून हे स्वागतार्ह आहे. हा आपला ठेवा असून तो जपला पाहिजे.” असा सल्ला देत त्यांनी साकारच्या नेतृत्वाचे कौतुक केले. (Sanjay Raut Shivsena UBT on veer Savarkar and Government)

“जसे बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील राहते घर सरकारने ताब्यात घेतले आहे. तिथे त्यांचे मेमोरियल केले आहे. मी त्यांचे या बाबतीत स्वागत करतो. वाघ नखे भारतात आणली, तलवार आणली त्यावर वाद सध्या सुरू आहे. आता वाघ नखे कुठे आहेत? निवडणुकीआधी प्रदर्शनात फिरवली. आता त्या वाघ नखांचे काय झाले?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“नागपूरच्या भोसल्यांची तलवार परत राज्यात आणली जाणार हे ठीक आहे. पण वीर सावरकरांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती. त्याबाबात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडली. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला विरोध नाही. पण खरी पदवी आणा. कागदाचा तुकडा ब्रिटिशांनी जप्त केला तरी आम्ही सावरकरांना बॅरिस्टरच मानतो,” असे म्हणत त्यांनी टोलादेखील लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img