19.9 C
New York

Sanjay Raut : मेट्रोच्या कामात दीड हजार कोटींची दलाली, राऊतांचा खळबळजनक दावा

Published:

देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबईमध्ये उपस्थित आहेत. अशामध्ये त्यांनी सोमवारी (27 मे) नांदेडमधील जाहीर भाषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Sanjay Raut) निशाणा साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत एक मोठे विधान केले. तर, दुसरीकडे मुंबईत नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रोची पहिल्या पावसात झालेली दुरवस्था ही चर्चेचा विषय ठरली. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, मुंबई मेट्रोच्या दुरवस्थेवरून संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. तसेच, यावेळी त्यांनी आशिष शेलार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारत-पाकिस्तानमधील सीजफायरच्या प्रश्नावर जयशंकर यांचं अमेरिकेला उत्तर

मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, “काल मुंबईत जो महापूर आला, त्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांची होती. काल अनेकांच्या स्वप्नात आनंद दिघे गेले आणि विचरले की एकनाथ कुठे आहे? मुंबई आणि ठाणे बुडाले पण एकनाथ कुठे आहे? एकनाथ शिंदे कुठे आहे तर अमित शहांचे लांगूलचालन करण्यात.” असे म्हणत त्यांनी उपहासात्मक टोला लगावला. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले की, “साडे तीन वर्ष सत्ता कोणाच्या हातात आहे? गाजावाजा करून मेट्रोचे उद्घाटन केले, पण काल जनतेचे हजारो कोटी रुपये बुडवले. मेट्रोच्या कामामध्ये या लोकांनी दीड हजार कोटींची दलाली खाल्ली आहे. गेल्या साडे तीन वर्षात सत्ता यांच्या हातात आहे, यावेळी 35 हजार कोटींची कमिशनखोरी झाली आहे. त्याच पैश्यातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले. आशिष शेलारांनी यावर बोलावे,” असे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img