राज्यात मान्सूनने काही ठिकाणी विश्रांती घेतली आहे. मात्र पावसाचा जोर घाटमाथ्यावर (Maharashtra Rain Update) वाढला आहे. पुढील काही (IMD Rain Alert) दिवसांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या काळात नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या (Pune Rain) घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे.
सध्या मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहिल. येथील काही जिल्ह्यांत तुरळक स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता. परंतु, जून महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली. विदर्भात पाऊस झाला. राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सार्वजनिक मालमत्तेचे राज्यात सर्वदूर झालेल्या या पावसाने नुकसान झाले. शेतीपिकांनाही मोठा फटका बसला होता. त्यानंतर पावसाने आता जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच उघडीप दिली. राज्यात साधारण 15 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. यावेळी मात्र मान्सून लवकर दाखल झाला होता. त्यामुळे पाऊस लवकर सुरू होईल अशी अपेक्षा होती.