शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनी आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) टीका केली. त्यांनी शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. पक्षाच्या विरोधकांनी केलेल्या अडथळ्यांचा उल्लेख केला. तर ‘डी कंपनी’चे राज्य देशात आणि राज्यात असल्याचा आरोप (Shiv Sena 59th Anniversary) केलाय. शिवसेनेला एकमेव मर्दांचा पक्ष असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या लोकांवरही टीका केली. शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल मोठा विश्वास व्यक्त केलाय.
Sanjay Raut शिवसेनेचा 59 वा वाढदिवस
खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की, आज शिवसेनेचा 59 वा वाढदिवस आहे. हा टप्पा गाठण सोपं नसतं. एखादा पक्ष 59 वर्ष पूर्ण करतोय, हा टप्पा गाठण सोपं नाही. या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकट हे या पक्षाच्या जीवनामध्ये आहेत. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना बलिदान करावं लागते. स्वतः शिवसेनेच्या प्रमुखांना तुरुंगवास भोगावे लागला.
बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष पुढे नेला. बाहेर सत्ताधाऱ्यांना वाटतं की, एखाद्या हिटलर प्रमाणे त्यांनी या पक्षावरती घाव घातले. असे अनेक घाव आम्ही पचवले. यापुढे देखील पचवू. या काळामध्ये अनेक लोक आले, अनेक लोक सोडून गेले. शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आहे. सत्तेची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यावेळी आम्ही सत्तेत सुद्धा चांगलं काम केलं आहे, शिवसेनेचे भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आले आहे.
Sanjay Raut विचार हिंदुत्वांचा, मराठी माणसाचा
संध्याकाळी क्षणमुखानंद येथे वर्धापन दिन साजरा होईल. शिवसेना प्रमुख हे प्रथेप्रमाणे मार्गदर्शन करतील, पुढील राजकीय दिशा शिवसैनिकांना संदर्भात मार्गदर्शन देखील करतील. महाविकास आघाडी मजबुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरली पाहिजे, अशी अनेकांची भूमिका आहे. आम्ही एकत्र आहोत. पण एकत्र राहत असताना शिवसेना आमचे आपले विचार आणि सत्व गमावणार नाही, विचार हिंदुत्वांचा मराठी माणसाचा असेल किंवा अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल शिवसेनेची ताकद हे त्यांच्या विचारप्रणालीमध्ये आहे स्वाभिमानामध्ये आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
शिवसेना सत्तेसाठी कोणासमोर झुकत नाही, तडजोडी केल्या नाहीत. मर्दांचा महासागर आहे. आज देशांमध्ये डी कंपनीचे राज्य आहे. भाजपचे म्हणजे डरपोक म्हणजे डी. दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्य सुरू आहे. दाऊदपासून इक्बाल मिर्चीपर्यंत असे अनेक गुंड झुंड त्यांचे असतात. देशद्रोही यांना घेऊन ही कंपनी महाराष्ट्रात राज्यात राज्य करत आहे. एका ठिकाणी प्रत्यक्षात दाऊत आणि एका ठिकाणी डरपोक या दोघांविरुद्ध शिवसेना एकमेव पक्ष ताकदीने लढत आहे. काही लोक पाठीवर वार करून गेले, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.