नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं यामुळे मोठं नुकसान झाले असून आर्थिक संकटात बळीराजा पुन्हा सापडला आहे. तर पिकांचे पंचनामे दुसरीकडे शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या देखील अद्याप झाले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करत आहे. नाशिक तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या कांदा पिकात पाणी साचल्याने संपूर्ण कांदा शेतात सडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमध्ये झालेल्या पावसात बाजार समितीमधील खळ्यात पावसाचे पाणी सचल्यानं कांदा गोण्यासह भिजला आहे. तर काही प्रमाणात कांदा अक्षरक्ष: वाहून गेला आहे. शेतीत भाजीपाला आणि बाजार समिती मधील कांदाचे मोठं नुकसान झाल्याने बळीराजाचे स्वप्न भंगल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जातेय.
Heavy Rain सिन्नर तालुक्यातील देवनदीची पाणी पातळी वाढली
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान या पावसामुळे सिन्नर बस स्थानकाच्या प्लँटफॉर्मच्या छताचा काही भाग शिवशाही बस आणि चारचाकी वर कोसळला. दरम्यान, बसमधील प्रवाश्यांनी प्रसंगावधन राखून बाहेर पडल्यानं सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. रविवार असल्यानं प्रवाशांची गर्दीही तुलनेने कमी असल्याने मोठा अनर्थ टळलाय. मात्र मागील दहा वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या बसस्थानकचा भाग कोसळल्याने कामच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. तर तिकडे जोरदार पाऊस सिन्नर तालुक्यातील इतर भागांत ही सुरू असून घरात पानी शिरल्याच्या घटना अनेक नागरिकांच्या घडल्या आहे. तर रस्ते झाले जलमय झाले आहे.
Heavy Rain उन्हाळ्यात कोरडी पडलीली मलंगगड नदी झाली प्रवाही
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातल्या नदीला पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात आज जलप्रवाह आला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात हीच नदी कोरडी पडली होती. मात्र मागील काही दिवसात झालेला अवकाळी पाऊस आणि आज सकाळपासून सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे ही नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामांनाही या परिसरात वेग येणार आहे.