19.9 C
New York

Maharashtra Weather : केरळात मान्सूनची हजेरी, महाराष्ट्रातही होणार लवकरच आगमन

Published:

मान्सूनपूर्व पावसाने शहर आणि उपनगरात शनिवारी (ता. 24 मे) रात्रीपासून जोरदार (Maharashtra Weather) हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची रविवारी (ता. 25 मे) सकाळी सुद्धा संततधार सुरू असल्याचेच पाहायला मिळत आहे. पण आता संपूर्ण राज्यासाठीची आनंदवार्ता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. कारण आठवड्याभराआधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत किंवा आठवड्याभरात महाराष्ट्रातही मान्सून हजेरी लावणार आहे. हवामान विभागाकडून मान्सून केरळमध्ये आठ दिवस आधीच दाखल झाला असल्याची घोषणा करण्यात आली आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरले असून आज रविवारी तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather: Monsoon presence in Kerala, will soon arrive in Maharashtra too)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी कोकण गोव्यातील बहुतांश ठिकाणांसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर चंद्रपूर आणि नागपूर भागातही हवामान विभागाकडून वर्तवली आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचेही समोर आले आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरासह ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. मुंबईत आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. सध्या पावसाच्या जोरदार सरी दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात बरसत आहेत. ठाण्यातही पाऊस सुरू झाला आहे.

पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून अद्याप पावसाची रिपरिप सुरू आहे. उन्हाळी भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान या पावसामुळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने शेतात पिकून आलेला भात शेतकऱ्यांना घरात आणणे कठीण झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला हा घास या पावसामुळे हिरावून घेतला जात तो की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. राज्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठा नुकसान झाले आहे. राज्यातल्या जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे 22 हजार 233 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img