भारताने पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनिती आखली आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरुन भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हवाई हल्ला भारताने यशस्वीरित्या परतवून लावला. पाकिस्तानच्या या नापाक कृतीला भारताने जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने प्रत्युत्तर म्हणून लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर आणि कोटली येथे कारवाई केली. भारताच्या सैन्य दलांनी काल आपली क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानने डागलेली मिसाईल्स, क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली. त्याचवेळी भारतानेही पाकिस्तानवर मिसाईल्स, ड्रोनद्वारे स्ट्राईक केला.
याआधी, भारताने काल चिनाब नदीची पाणी पातळी कमी केली होती. वृत्तसंस्था एएनआयनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी चिनाब नदीवरील बागलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद केले. चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे सर्व दरवाजेही बंद करण्यात आले. तथापि, भारताने आपली नैसर्गिक जबाबदारी समजून घेतली आहे आणि सागरी जीवसृष्टीची काळजी घेतली आहे. सागरी वन्यजीवांवर कोणताही मोठा परिणाम होऊ नये म्हणून सलाल आणि बालीघर धरणांच्या एका गेटमधून पाणी सोडण्यात येत होते.
India-Pakistan War इस्लामाबादच्या शेतातील पाण्याची पातळी कमी झाली आहे का?
सिंधू नदी करारात झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज यांचा समावेश आहे. त्यांचा वापर करण्याचे अधिकार १९६० च्या कराराद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागले गेले. पाकिस्तान सिंचनासाठी या नदी प्रणालींवर अवलंबून आहे.
पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाचे प्रवक्ते मुहम्मद खालिद इद्रिस राणा यांनी ब्लूमबर्गला सांगितले की, भारताने पाकिस्तानकडून मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण सुमारे ९० टक्क्यांनी कमी केले आहे. जर प्रवाह कमी होत राहिला तर इस्लामाबादला शेतांना पाणीपुरवठा एक पंचमांश कमी करावा लागेल, असे ते म्हणाले. ते म्हणाले की भारत सहसा वीज निर्मितीसाठी दररोज काही पाणी राखीव ठेवतो, परंतु दर काही तासांनी ते सोडतो.
पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाच्या (IRSA) सल्लागार समितीने सोमवारी मराला येथे चिनाब नदीच्या प्रवाहात अचानक घट झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले होते की भारताच्या या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई निर्माण होईल. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे हे भारताच्या पाणी सोडण्याच्या क्षमतेचे एक धोरणात्मक संकेत म्हणून पाहिले जाते. तथापि, असेही म्हटले जात आहे की या भागात मुसळधार पावसामुळे वाढत्या पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धरणावरील दाब व्यवस्थापित करण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे.