महाराष्ट्र आणि बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतापले आहेत. जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? अर्ब नक्षलवादाच्या आधी दहशतवाद मोडून काढा, असं आव्हान संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. गुरूवारी बीडमध्ये पोलीस ठाण्यासमोर एकाची हत्या झाली. पोलीस ठाण्याच्या आवारात कोयत्यानं सपासप वार करून एका सामाजिक कार्यकर्त्यांचं जीवन संपवलं आहे. बीडचा बिहार झालेला आहे. तिथे कुणाचेही लक्ष नाही. जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? अर्बन नक्षलवादाच्या आधी बीडचा दहशतवाद मोडून काढा.”
तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती; पेट्रोल टाकून सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
“कायद्याचा धाकच राहिला नाही. कारण, पोलीस खात्यात भ्रष्टाचार वाढला आहे. पैसे दिल्याशिवाय नेमणूका होत नाहीत. एकदा पोलीस पदावर बसवल्यावर तो कमाई आणि वरच्यांना हफ्ता देण्यासाठी काम करतो,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.