टॅरिफच्या मुद्द्यावर आता भारतही अमेरिकेला टक्कर (India US Tariff War) देण्याच्या पवित्र्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच एक मोठा (India on US Tariff) निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकारने कॉटनच्या ड्यूटी फ्री इम्पोर्टची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. उद्योगाचा खर्च आणि निर्यातीवरील दबाव यामुळे भारतीय टेक्सटाइल आणि टेक्सटाइल वाढला आहे.
अमेरिकेने भारतातून येणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त शु्ल्क आकारले आहे. भारताने रशियाकडून तेल (Russian Oil) खरेदी करणे सुरुच ठेवले आहे. त्यामुळे ट्रम्प सरकारने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादले. या निर्णयामुळे भारताची मोठी कोंडी झाली आहे. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने रशियाकडील तेल खरेदी बंद केलेली नाही.आता सरकारने कापसाची आयात ड्युटी फ्री करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे देशांतर्गत उद्योगांना कमी पैशात कच्चा माल उपलब्ध होईल. यामुळे अमेरिकी टॅरिफचा प्रभाव काही प्रमाणात कमी होईल असे सांगण्यात येत आहे.