21.7 C
New York

Sanjay Raut : अनुराग ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र मागण्याची निवडणूक आयोगत हिंमत आहे का?- संजय राऊत

Published:

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Sanjay Raut) पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांत मतचोरी होत असल्याचे पुरावे सादर केले होते. त्यातच आता बिहारमध्ये मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीचा (SIR) मुद्दाही चांगलाच तापला आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत राहुल गांधींचा अ‍ॅफिडेव्हीट सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. आता यावरुन संजय राऊत यांनी टीका केली.

नुकतंच पत्रकारांशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना निवडणूक आयोगाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. तुम्ही राहुल गांधींकडे अ‍ॅफिडेव्हीट मागताय, या देशातील ८० कोटी जनता अ‍ॅफिडेव्हीट द्यायला तयार आहे. अनुराग ठाकूर यांनीही तोच आरोप केला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

याला मग्रुरीही म्हणतात. निवडणूक आयोगाच्या प्रमुख पदावर बसलेल्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून ही मग्रुरी अपेक्षित नाही. भाजपच्या हस्तकांकडून हा अ‍ॅरॉगन्स अपेक्षित आहेत, त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. तुम्ही राहुल गांधींकडे अ‍ॅफिडेव्हीट मागताय, या देशातील ८० कोटी जनता अ‍ॅफिडेव्हीट द्यायला तयार आहे. अनुराग ठाकूर यांनीही तोच आरोप केला आहे. त्यांच्याकडे अ‍ॅफिडेव्हीट मागायची हिंमत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

सर्वात आधी निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्र्‍यांकडे अशाप्रकारे प्रतिज्ञापत्रक मागायला हवं. राहुल गांधींनी जे प्रश्न विचारलेले आहे.,त्यावर निवडणूक आयोगाने उत्तर दिलेले नाही, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर दिले. राजकारण निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून केले जात आहे. पण खोट्या आरोपांमुळे निवडणूक आयोग घाबरणार नाही. निवडणूक आयोग भारतातील सर्व मतदारांसोबत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img