23.1 C
New York

Bharat Bandh : आज भारत बंदची हाक, कुठे कुठे दिसतोय प्रभाव ?

Published:

आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून देण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून ते कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात आंदोलन करत आहेत. आज देशभरात भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. या संपाची हाक 10 केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठानेदिली आहे. याला शेतकरी संघटना आणि ग्रामीण कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.

या संपामुळे बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, राज्य वाहतूक, औद्योगिक उत्पादन, वीजपुरवठा आणि इतर अनेक अत्यावश्यक सेवा बंद राहतील. या सार्वजनिक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. तथापि, दैनंदिन कामावर या ‘भारत बंद’चा लोकांच्या कोणताही विशेष परिणाम होणार नाही, असे अनेक व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

Bharat Bandh कुठे दिसतोय भारत बंदचा परिणाम ?

भारत बंदचा परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. तथापि, मतदार यादी सुधारणेच्या विरोधातही बिहारमध्ये संप सुरू आहे. तेथे गाड्या थांबवल्या जात आहेत. यासोबतच, लोक टायर जाळत असल्याचे चित्रही समोर येत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी देखील पाटण्याला रवाना झाले आहेत. बिहारमध्ये भारत बंदचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. हाजीपूर, अररिया, दानापूर येथे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

Bharat Bandh हेल्मेट घालून बस ड्रायव्हर चालवत आहेत बस

तसेच भारत बंदचा परिणाम पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येही दिसून येत आहे. कोलकात्यातही भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जाधवपूर ८बी बसस्थानकाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बसचालक सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालून बस चालवत आहेत. कोलकातामध्ये भारत बंद असूनही, जाधवपूरमध्ये खाजगी आणि सरकारी बसेस धावत आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी, बस चालक हेल्मेट घालून बस चालवत आहेत.

Bharat Bandh संपामध्ये सहभागी असलेल्या प्रमुख संघटना

– ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस (AITUC)

-इंडियन नॅशनल ट्रेड यूनियन कांग्रेस (INTUC)

-सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (CITU)

-हिंद मजदूर सभा (HMS)

-सेल्फ-एम्प्लॉईड वूमन्स एसोसिएशन (SEWA)

-लेबर प्रोग्रेसिव फेडरेशन (LPF)

– यूनाइटेड ट्रेड यूनियन कांग्रेस (UTUC)

Bharat Bandh आंदोलनाचे कारण काय ?

सरकारने लागू केलेली चार नवीन कामगार संहिता हे या संपाचे मुख्य कारण आहे. या नियमांमुळे संप करणे कठीण होते, कामाचे तास वाढतात, कंपनी मालकांना शिक्षेपासून संरक्षण मिळते, नोकरीची सुरक्षा आणि योग्य वेतन धोक्यात येते असा कामगार संघटनांचा आरोप आहे. खाजगीकरण आणि कंत्राटी कामगारांच्या वाढत्या भूमिकेलाही विरोध आहे. यापूर्वी 2020, 2022 आणि 2024 सालू देखील अशाच प्रकारचे देशव्यापी संप झाले होते, ज्यात लाखो कामगार कामगार समर्थक धोरणांची मागणी करत रस्त्यावर उतरले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img