17.8 C
New York

Bangladesh Crisis : बांग्लादेशला आणखी एक धक्का! ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY, नेमकं काय घडलं?

Published:

भारतानेआणखी एक धक्का (India Bangladesh Conflict) बांग्लादेशला दिला आहे. जूट उत्पादने आणि तयार कपड्यांवर बांग्लादेशातून येणारी बंदी घालण्यात आली आहे. जमीन मार्गाने होणाऱ्या या वस्तूंच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे. भारतात तरीही न्हावा शेवा बंदराच्या माध्यमातून ही उत्पादने (Bangladesh Crisis)आणता येतील. विदेश व्यापार महानिदेशालयाने (डीजीएफटी) यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.

भारताने शनिवारी ईशान्येकडील भागात जमिनीच्या मार्गाने बांगलादेशातून तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लादले. आयातीला फक्त न्हावा शेवा (जवाहरलाल नेहरू बंदर, नवी मुंबई) आणि कोलकाता सागरी बंदरांमधून परवानगी असेल.वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. तथापि, ही बंदी भारतमार्गे नेपाळ आणि भूतानला पाठवल्या जाणाऱ्या बांगलादेशी वस्तूंना लागू होणार नाही. या बदलांसाठी, देशाच्या आयात धोरणात एक नवीन परिच्छेद जोडण्यात आला आहे, जो बांगलादेशातून भारतात या वस्तूंच्या आयातीचे तात्काळ नियमन करेल. यापूर्वी, भारताने ९ एप्रिल रोजी बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा मागे घेतली होती.

Bangladesh Crisis बांगलादेश भारतातून वस्तू निर्यात करू शकणार नाही.

बांगलादेश भारतामार्फत नेपाळ आणि भूतान वगळता इतर देशांमध्ये वस्तू निर्यात करू शकत नाही. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी अलीकडेच चीनमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये युनूस म्हणाले होते की, बांगलादेशशी सुमारे १,६०० किमीची सीमा असलेल्या भारताच्या सात ईशान्य राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही.

भारतातील ही राज्ये सागरी मार्गांसाठी बांगलादेशवर अवलंबून आहेत. युनूस यांनी असेही म्हटले की बांगलादेश हा या प्रदेशातील हिंदी महासागराचा एकमेव संरक्षक आहे. युनूस यांनी चीनला बांगलादेशमार्गे जगभर माल पाठवण्याचे आमंत्रणही दिले. युनूसच्या या बढाईखोरीला भारताने खूप गांभीर्याने घेतले.
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सत्तापालटानंतर, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये हिंदूंवर सतत हल्ले होत आहेत. युनूस सतत भारतविरोधी पावले उचलत आहेत आणि चीन पाकिस्तानच्या जवळ येत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण होत आहेत. २०२३ मध्ये भारत-बांगलादेश व्यापार १२.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img