श्रावणात चिकन, मांस, अंडी अनेकांसाठी (Eggs Price Hike) वर्ज्य असते. त्यामुळे अनेक जण श्रावणापूर्वीच त्यावर तुटून पडतात. अनेक जण ऐन आषाढातच एक महिना श्रावण पाळावा लागत असल्याने चंगळ करतात. पण अंडी प्रेमींची चिंता वाढली आहे, कारण अचानक अंड्यांचे भाव वधारले आहेत. उन्हाळ्यात धाराशीव, लातूरसह काही जिल्ह्यात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने अनेक कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. एकीकडे मागणी जास्त आणि उत्पादनावर परिणाम या व्यस्त प्रमाणामुळे अंड्यांचा भाव वधारला आहे. आषाढातच अंड्यांसाठी ग्राहकांच्या खिशावर बोजा पडला आहे. आता जादा पैसा 12 नग अंडीसाठी मोजावे लागत आहे. किती वाढली किंमत?
Eggs Price Hike राज्यात अंडे महागले
श्रावण आल्याने आता उन्हाळा संपल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत किरकोळ बाजारात दर पोहोचले आहेत. ४७० रुपये १०० अंडींसाठी घाऊक दरमार्चमध्ये मुंबईत होता, तो ५९१ रुपये इतका जूनच्या अखेरीस झाला आहे. अधिक उष्म्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूमुळे उत्पादन घटले आणि पावसाळ्यात वाहतुकीतील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, असे पोल्ट्री व्यवसायिकांचे म्हणणे आहे. अंडी ९० रुपये लोखंडवाला येथे , ८० रुपये वांद्रे आणि बोरीवलीत, तर ७८ रुपय वसईत दराने विकली जात आहेत. ११७ रुपये डझन दर ऑनलाइन खरेदीदारांना चेंबूर आणि कांजुरमार्ग येथे मोजावा लागत आहे.
ब्रेडकाफ्टचे सुरेश पासवान म्हणाले, “उन्हाळ्यात उष्म्यामुळे पक्षी मरतात, त्यामुळे उत्पादनात घट होते. मोठं होण्यासाठी नवीन पिल्लांना वेळ लागतो आणि सुरुवातीला लहान अंडी मिळतात.” ते म्हणाले की, दर १५-२० दिवसांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. इतकेच नाही तर अंडा भुर्जी आणि इतर खाद्यपदार्थासाठी सुद्धा ग्राहकांना जास्त पैसा मोजावा लागणार आहे.