21.7 C
New York

Digital India : ‘डिजिटल इंडिया’चे 11 वर्ष पूर्ण, काय काय झाले बदल?

Published:

गेल्या 11 वर्षांत भारताने डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून प्रशासन, सार्वजनिक सेवा आणि अनेक क्षेत्रात ऐतिहासिक बदल पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात डिजिटल इंडिया ही केवळ एक संकल्पना ठरली नाही तर परिवर्तनाचा दूत ठरली आहे. तंत्रज्ञानातील नवीन झेप ग्रामीण भागात बदलाचा पाचा रोवणारी ठरली. या नव्या बदलामुळे ग्रामीण भागातही अनेक जणांना काही ना काही हाती लागले. त्यांना काहीतरी गवसले.

Digital India युपीआय आणि डिजिटल पेमेंट

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचा (UPI) डिजिटल व्यवहाराचा चेहरा बदलण्यात मोठा वाटा आहे. UPI च्या माध्यमातून 24.77 लाख कोटी रुपयांचे 18,301 दशलक्ष व्यवहार मार्च 2025 मध्ये केवळ एका महिन्यात झाला. 460 दशलक्षहून अधिक आणि 65 दशलक्ष व्यापारी UPI चा वापरआज करत आहेत. ACI वर्ल्डवाईडच्या एका अहवालानुसार, रियल टाईम पेमेंटमध्ये भारताचा वाटा 2023 मध्ये जागतिक 49 टक्के इतका मोठा आहे.

Digital India डिजिटल ओळख अधिक विश्वासहर्य

आधारने डिजिटल ओळख अधिक विश्वासहर्य ठरली आहे. सरळ आणि सुटसुटीत ई-केवायसी आणि सेवा वितरण केले आहे. 141.88 कोटी आधार एप्रिल 2025 पर्यत तयार झाले आहेत. त्याच्याशी संबंधित 43.95 लाख कोटींची लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून हस्तांतरीत करण्यात आली आहे.

Digital India भारत जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट

5G ची सुरुवात आणि 4.74 लाख BTS टॉवरच्या माध्यमातून भारत जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट देणारा देश ठरला आहे. भारतनेट योजनेने 2.14 लाखांपेक्षा जास्त हायस्पीड, अतिवेगवान इंटरनेटने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावात डिजिटल सेवा पोहचल्या आहेत.

Digital India आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काय बदल

कोविड पोर्टलनुसार, कोविड लसीकरण 220 कोटींहून अधिक करण्यात आले. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यात आला. भारत जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाचा अग्रदूत ठरला. सामान्य सेवा केंद्र (CSC) ग्रामीण भारतात बँकिंग, विमा आणि शिक्षणासारख्या सेवा 5.97 लाख केंद्रोंच्या माध्यमातून देतात.

Digital India तंत्रज्ञानातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल: IndiAAI मिशन

IndiAAI मिशन, भारत सेमीकंडक्टर मिशन आणि संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणात मोठी झेप घेतली आहे. या योजनांमुळे भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल केली आहे.भारताची GPU क्षमता मे 2025 पर्यंत 34,000 पेक्षा अधिक झाली असून 1.55 लाख कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे.

Digital India संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाचा नारा

सर्वाधिक संरक्षण उत्पादनाचा टप्पा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताने आतापर्यंतचा गाठला आहे. हे उत्पादन 1,27,434 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 2014-15 मध्ये हा आकडा 46,429 कोटी रुपये होता, म्हणजेच गेल्या 10 वर्षांमध्ये या आकड्यात 174 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस, अर्जुन टँक, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर यासह विविध स्वदेशी बनावटीची नौदल जहाजे ही भारताच्या वाढत्या तांत्रिक क्षमतेचं आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img