राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोणत्याही वेळी लागण्याची शक्यता असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता मोठं विधान केलंय. पावसाळ्याचे महिने संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुका लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असं निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाचे महिने संपल्यानंतर पार पडणार आहेत. 2022सालापासून निवडणुका होणार होत्या, पण आता 2025 सुरु आहे अद्यापही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील काळात निवडणुका जाहीर होणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
तसेच एससी, एसटी प्रवर्गातील नागरिक अद्यापही वंचित आहेत त्यांना पुढं आणण्याचं काम केलं पाहिजे. यासोबतच ओबीसींनाही प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे त्यासाठी एवढा काळ गेला आहे. 2022 ला निवडणुका होणार होत्या पण आता 2025 ला होणार आहेतय आम्हाला याचा फटका लोकसभा निवडणुकांमध्ये बसलायं. तीन वर्षे संधी न मिळाल्याने गॅप पडला. निवडणुका लागतील म्हणून जे तयारी करत होते त्यांनी वारेमाप खर्च केला कार्यक्रम केले पण निवडणुका लागल्या नाहीत, आजपासून कामाला लागा. निवडणुकीत आरक्षण कसे निघतील ते सांगता येत नाही पण तुम्ही प्रभागात आपला संपर्क वाढवण्याचं काम करा , चार जणांचा प्रभाग म्हणजेच दोन पुरुष महिला असा होऊ शकतो, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
Ajit Pawar PM मोदींचा करिश्मा पाहुन जनतेचा पाठिंबा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पाहुन देशातल्या लोकांनी पाठिंबा दिला. मी मी म्हणणारे लोकं पराभूत झाले आहेत.वेगळ्या पक्षात काही जणांना जावं लागलं पण ते शरीराने तिकडं असले तरीही मनाने आपल्याकडे होते. बारामती लोकसभेत आपल्याला पराभव स्विकारावा लागला. आमचा कुठेतरी मानसन्मान ठेवण्याचा प्रयत्न करा, मी कार्यकर्त्यांना असं सांगितलं असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
Ajit Pawar स्वत:चा जीव सांभाळून पावसात भिजण्याचा आनंद लुटा
कुंडमळा येथील दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला. तुम्ही तिकडं कसे गेले असं विचारलं तर ते म्हणाले अर्धा तासाच्या अंतरावर आम्ही तिथं फिरायला गेलो पण तिथं अक्षरश पूल पडला गर्दी झाली होती पाणी वाहत होतं, कारण नसताना होत्याचं नव्हतं झालं. धरणे, धबधबे नद्यांचा परिसर डोंगरदऱ्यात फिरणे पावसात भिजण्याचा आनंद असतो आता नागरिकांना विनंती, पण स्वतचा जीव सांभाळून. विमान दुर्घटना आणि कुंडमाळ दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना चिरशांत मिळो, असं अजित पवार म्हणाले आहेत.