19.5 C
New York

Maharashtra Rain : राज्यात पुढील 5 दिवस धो धो पाऊस; IMD चा अंदाज काय?

Published:

मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत (Maharashtra Rain) आहे. पुढील २४ तासांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीजारी केला आहे. सतर्कचा इशारा यामुळे या भागातील नागरिकांना देण्यात आला आहे. राज्यात आता पूर्णपणे मान्सून सक्रीय झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या सर्वदूर मान्सूनचा पाऊस पडत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. १५ ते १६ जून दरम्यान साधारणपणे मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापतात. तसेच मौसमी पावसाने बहुतांश गुजरात व्यापला. याचबरोबर झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण आहे. राज्यात बहुतेक भागात पुढील पाच दिवस चांगला पाऊस पडेल, हवामान विभागाने असा अंदाज व्यक्त केला आहे.

Maharashtra Rain नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे राज्यभरात पावसाचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीजारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कालपासून म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून कोसळत आहे. आज काही ठिकाणी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी, अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे.

Maharashtra Rain राज्यातील काही भागांत जनजीवनावर परिणाम

गेल्या २४ तासांत सर्वाधिक ८३.४ मिमी पावसाची नोंद (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे (७३.७ मिमी), मुंबई शहर (६२.९ मिमी), रायगड (५४.१ मिमी) आणि पालघर (४९.७ मिमी) जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागांत जनजीवनावर परिणाम झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत असून, नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर भेगा पडल्याने वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. तर सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

दरम्याने मान्सूनने महाराष्ट्रात दमदार एंट्री केली असून, पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img