रेल्वेची घडलेली घटना दुःख द आहे यामध्ये किमान राजकारण केले जाऊ नये. हा अपघात कशामुळे घडला, तांत्रिक काही अडचणी होत्या का ? मोटारमध्ये काही बिघाड झाला होता का? याबाबी तपासणे गरजेचे आहे. मात्र आता विरोधक यांच्याकडे कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाही. या घटनेचे दुःख मलाही झाले आहे. या घटनेची पूर्ण चौकशी झाली की त्यानंतर भाष्य केलं तर योग्य राहील अशी प्रतिक्रिया देत विरोधकांना देखील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी टोला लगावला आहे.
भारतीय जनता पार्टी पक्षाच्या एका कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रेल्वे अपघाताबाबत दुःख व्यक्त करत त्यांनी विरोधकांचे कान टोचले. तसेच यावेळी त्यांनी आन्य विषयांवर देखील भाष्य केले. यावेळी रेल्वे अपघातावर बोलताना विखे म्हणाले , अनेक रेल्वे ट्रॅक हे निर्माण झाले आहे. मुंबई मित्र सारखे प्रकल्प हे अत्यंत यशस्वीपणे सुरु आहे.गर्दीच्या काळात जे प्रवासी हे दरवाज्यांना लटकून प्रवास करतात हे झाले नाही अशी अपेक्षा आहे. याबाबत रेल्वे सुरक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने देखील काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच ही जी काही दुर्घटन घडली आहे. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यानंतर हा प्रकार कसा काय घडला? याबाबत सत्य समोर येईल. अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
Radhakrishna Vikhe Patil नेमक प्रकरण काय घडलं?
मुंबई लोकलमधून आठ प्रवासी पडले, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झालाय. दोन लोकल ट्रेनमध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असं मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेमधील जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना काहीवेळापूर्वी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.