मुंबई लोकलमधील मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू (Mumbai Local)झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतानामध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी माहिती दिली की, दिवा आणि मुब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातामध्ये लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडले. हे सर्व प्रवासी दरवाजाच्या फूट बोर्डवर होते. दुर्घटनास्थळी 9 वाजून 50 मिनिटांनी रुग्णवाहिका पोहोचली, अशी माहिती त्यांनी दिली आहे. “आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासून खाली पडले आहेत. हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर प्रवास करत होते. सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली तर याठिकाणी 9.50 वाजता रुग्णवाहिका पाठवण्यात आली.” अशी माहिती त्यांनी दिली.
5 ते 6 जण या घटनेमध्ये दगावल्याची माहिती देण्यात येत आहे. याबाबत सीपीआरओ स्वप्नील निला यांनी सांगितले की, “आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 8 प्रवासी रुळांवर पडले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप रुग्णालयाने कोणतीही माहिती दिली नाही. आम्ही अद्याप रुग्णालयाच्या माहितीची वाट बघत आहोत. आम्ही याबद्दल लवकरच माहिती देऊ.” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी पुष्पक एक्स्प्रेसचा संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकलमध्ये वाढती गर्दी पाहता यवर अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सांगितले गेले. “नव्या लोकल गाड्यांमध्ये दरवाजे आपोआप बंद होणारे असतील. तसेच, कल्याण ते कसारा तिसऱ्या रेल्वे लाईनचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, सहावी लाईन सीएसएमटीपर्यंत टाकणार आहोत,” अशी माहिती स्वप्नील निला यांनी दिली.
391 आणि धावत्या रेल्वेतून पडून 272 जणांचा मृत्यू मध्य रेल्वेमध्ये ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर 663 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी अनेक जण धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे मरण पावले आहेत. रेल्वे रुळ ओलांडताना 391 आणि धावत्या रेल्वेतून पडून 272 जणांचा मृत्यू या काळात झाला आहे. रेल्वेतून पडणे, रुळ ओलांडणे, तसेच गर्दीमुळे पडणे या कारणांमुळे प्रवाशांचे मृत्यू होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये अनेक लोकांचा अशाप्रकारे लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. प्रवासात नेहमी सावध राहावे, रेल्वे रुळ ओलांडू नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी विचारपूर्वक प्रवास करावा. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षिततेचे पालन करण्याचे आवाहन रेल्वेकडून वारंवार केले जाते.