गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने उसंत घेतली आहे. ((Maharashtra Rain) पण अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असते. मुंबईत अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे उकाडा वाढला आहे. ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पण आता हळूहळू पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील, कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे या दरम्यान वाहणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरींचीसुद्ध हजेरी असेल.
काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल पाहायला मिळत आहे. ऊन-सावलीच्या खेळामध्ये मधेच पाऊस हजेरी लावत असल्याने उकाडा वाढू लागला आहे. पण आता हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, घाटमाथ्यावरील भागामध्ये आज शनिवारी (ता. 7 जून) मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता शनिवारी घाटमाथ्यावर असून, पुणे, सातारा, सांगली या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार, पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील, कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरींचीसुद्ध हजेरी असेल. गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे एकाच जागेवर स्थिरावल्यामुळे मोसमी पावसाचा जोर कमी झाला. मात्र त्यामुळे अधूनमधून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरीसुद्धा बरसल्या. राज्यात एकिकडे पावसाची चिन्हे असली तरीही दुसरीकडे मात्र उकाडा वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळं राज्यातील तापमानाच विभिन्नता दिसून येत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यात ब्रम्हपुरी इथे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.