गेल्या काही काळापासून महागाई आणि बेरोजगारीवरून कॉंग्रेसने भाजपला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर महागाईच्या मुद्द्यावरून घेरले आहे. आता लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आकडेवारी सादर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, “आकडेवारी सत्य सांगते, घरभाडे, घरगुती महागाई, शिक्षण खर्च, जवळजवळ प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. आपल्याला अशी अर्थव्यवस्था हवी आहे जी केवळ काही निवडक भांडवलदारांसाठी नव्हे तर प्रत्येक भारतीयासाठी काम करेल,” असे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi Congress criticized BJP Government on Inflation and enemployement)
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आकडेच सत्य बोलतात, गेल्या वर्षी दुचाकींच्या विक्रीमध्ये 17 टक्के तर चारचाकीच्या विक्रीमध्ये 8.6 टक्के घट झाली आहे. मोबाईल बाजारपेठेमध्येही 7 टक्के घट झाली आहे. तेच खर्च आणि कर्ज दोन्हीही दुसरीकडे सातत्याने वाढत आहे. घरभाडे, घरगुती महागाई, शिक्षणाचा खर्च, जवळजवळ प्रत्येक गोष्ट महाग होत चालली आहे. ही फक्त आकडेवारी नव्हे तर प्रत्येक सामान्य भारतीयाचे आर्थिक दबावाखाली असलेल्या वास्तव आहे.” असे म्हणत त्यांनी टीका केली.
तसेच राहुल गांधी यांनी पुढे लिहिले आहे की, “आम्हाला असे राजकारण हवे जे इवेंट्सच्या झगमगाटाशी नव्हे तर सामन्यांच्या वास्तवाशी जोडलेले असेल. असे राजकारण हवे जे योग्य प्रश्न उपस्थित करतील, परिस्थिती समजून घेईल आणि जबाबदारीने प्रतिसाद देईल. आपल्याला अशी अर्थव्यवस्था हवी आहे जी केवळ काही निवडक भांडवलदारांसाठी नव्हे तर प्रत्येक भारतीयासाठी काम करेल,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावरून आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.