27.9 C
New York

Sanjay Raut : महाजनांच्या कार्यालयात अभिषेक कौल नावाचा दलाल, राऊतांच्या आरोपांनी खळबळ

Published:

मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गट जमीनदोस्त करण्याचे विधान केल्यापासून राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महाजनांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले. ज्यानंतर महाजनांनकडूनही उत्तर देण्यात आले. पण आता मात्र, गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रश्न उपस्थित केले असून त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत, पण महाजनांच्या कार्यालयात बसणारा अभिषेक कौल हा एक दलाल असून तो बिल्डर आहे. महाजन फाइल्सवर त्याने सांगितल्याशिवाय सही सुद्धा करत नाही, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Sanjay Raut makes serious allegations against Girish Mahajan, naming person named Abhishek Kaul)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 4 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत म्हटले की, भाजपा आणि शिंदे गटाच्या लोकांचा दुसऱ्यांचे पक्ष फोडणे हा एकच अजेंडा आहे. ते आपापल्या मंत्रालयातली कामे करत आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. मोठी मिन्नतवारी करून त्यांना मंत्रालयात घेतले आहे अशी माहिती माझ्याकडे आहे. त्यांना मंत्रिपदावर घ्यायला केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण यांच्यावर भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. पण गिरीश महाजन यांच्या मंत्रालयात अभिषेक कौल नावाचा कोणता व्यक्ती आहे? हा एक ठेकेदार आणि बिल्डर आहे, तो महाजन यांच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन आपत्ती व्यवस्थापनाची एकही फाईल मंजूर करत नाही. कौलकडे सर्व पैसे जमा होतात. आपत्ती व्यवस्थापन हे खातं सर्वसामान्यांशी संबंधित खातं आहे. पण या विभागाच्या कार्यालयात 350 फाइल पडून आहेत. कारण त्यांचे व्यवहार बाकी आहेत. अभिषेक कौल हा ठेकेदार आणि बिल्डर गिरीश महाजन यांनी नेमलेला आहे, सगळे व्यवहार हा कौल करतो, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.

युतीवर मनसेचं मौन, आदित्य ठाकरेंने दिला हिरवा कंदील, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

तसेच, फडणवीसांनी हे लक्षात घ्यावे. फडणवीसांनी याचे पुरावे मागावे, ते मी द्यायला तयार आहे. पण तुम्ही कारवाई करणार नाही हे मला माहीत आहे. पण संपूर्ण राज्याला कळाले पाहिजे की फडणवीसांनी काय लायकीचे मंत्री मंत्रिमंडळात ठेवले आहेत. फडणवीसांनी जे साधु संतांचे महामंडळ जमा केले आहे, त्यातले एक साधु संत हे गिरीश महाजन आहेत. काल कुंभमेळा निमित्त जी बैठक झाली आणि ते साधु संतांचे चरण स्पर्श करत होते त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल पटेल या ईडी पीडित साधू संतांच्या पाया पडायला हवे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला. नाहीतर त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत. अभिषेक कौल या व्यक्तीच्या मंजुरीशिवाय किंवा त्याने एखाद्या फाइलचा व्यवहार पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन आणि पुर्नवसन हे महत्त्वाचे विषय या खात्यातली परिस्थिती आहे. जिथे सामान्य लोकांच्या आयुष्याचा प्रश्न येतो, तिथे महाजन मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाइल मंजूर करतात. अशा व्यक्तीने पक्ष फोडीचा विचार करावा यात सगळे आले, असेही यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले आहे.

तर, देवेंद्र फडणवीस हे अशा गोष्टींबद्दल खोटं बोलतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. भ्रष्टाचार अंदाज समितीच्या पीएनेच केला होता. या प्रकरणी आम्ही आणलेल्या दबावामुळे गुन्हा दाखल करावा लागला. 15 कोटी रुपयांचा नजराणा शासकीय वास्तूत अंदाज समितीच्या चेअरमनच्या पीएकडे जमा झाला, फडणवीस तुम्ही कुणाशी खोटे बोलत आहात? या मंत्रालयातील फाइल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही. गिरीश महाजनांच्या 350 फाइल्सचे पुरावे आम्ही देऊ, हे पुरावे आम्ही किरीट सोमय्यांकडे सुद्धा देऊ. पण ते आहेत कुठे विचारा? असा टोला यावेळी राऊतांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img