35.8 C
New York

Sanjay Raut on Girish Mahajan : “भाजप दलालांच्या ताकदीवर पक्ष फोडतोय; गिरीश महाजन हे पहिला दलाल” संजय राऊतांचा तीव्र आरोप

Published:

राजकारणातला गलिच्छ खेळ आता उघडपणे समोर येतोय. संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेत भाजपवर आणि खास करून गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “टेंडरबाजी, खंडणी, धमक्या ही भाजपची नवी ओळख झाली आहे. सत्ता गमावल्यावर राजकारणाची पातळी किती घसरू शकते, हे भाजपने दाखवून दिलंय.”

राऊतांचा थेट आरोप होता की, भाजपने पक्ष फोडण्यासाठी काही दलाल नेमले आहेत आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा चेहरा म्हणजे गिरीश महाजन. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “गिरीश महाजन हा पहिला दलाल आहे. आज जे पक्ष फोडतोय, तो उद्या सत्ताबदल झाल्यावर सर्वात आधी पक्ष बदलेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याच महाजनांनी निरोप पाठवले होते की, ‘मी राजकारणातून बाहेर पडतो, मला शांततेत जगू द्या’. म्हणजेच, ते स्वतःच पक्ष बदलण्याच्या तयारीत होते.”

राऊत पुढे म्हणाले, “आज जे भाजप दिसतोय, तो भ्रष्ट, राष्ट्रद्रोही आणि दलालांच्या साथीने चालतोय. एकेकाळी भाजप पवित्र विचारांचा पक्ष होता, आज तो ठेकेदारांचा अड्डा झाला आहे. हेच लोक आज शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

गिरीश महाजनांवर वैयक्तिक निशाणा:

“गिरीश महाजन हे एक नंबरचे डरपोक आहेत,” असं स्पष्ट बोलून राऊतांनी त्यांना घेरलं. ते म्हणाले, “जेव्हा त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू झाली होती, तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंकडे हात टेकले होते. आता हेच महाजन मोठ्या गाजावाजात इतरांना धमक्या देत आहेत. पण लक्षात ठेवा, वेळ ही प्रत्येकाची येते. उद्या या लोकांचाही काळ येणार.”

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना संपवण्याचा आरोप:

राऊतांनी भाजपवर खास करुन गिरीश महाजनांवर शिवसेना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केला. “तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्यांनी तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवलं, त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच संपवण्याची भाषा करता? शिवसेना संपणार नाही. गिरीश महाजनांच्या दहा पिढ्या आल्या तरी शिवसेना टिकून राहणार,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

राज-उद्धव एकत्र येणार? – संकेत स्पष्ट

राऊत यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं – उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का? “सुनील प्रभू आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. दोघे एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे, पण सगळं लगेच उघड करत बसायचं नाही. योग्य वेळ आली की सगळं सांगितलं जाईल,” असं राऊत म्हणाले.

भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात – केंद्रावर घणाघाती टीका

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा दिवसेंदिवस घसरते आहे, असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. “भारताला जी-20 परिषदेचं निमंत्रण मिळालं नाही. नेपाळसारखाही देश आपल्या बाजूने उभा राहत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर एकही राष्ट्र आपल्या समर्थनार्थ उभं राहिलं नाही. ही मोदी सरकारची मोठी अपयशाची नोंद आहे,” असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img