28.2 C
New York

MI vs PBKS : क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाबने केला मुंबईचा पराभव

Published:

रविवारी (ता. 1 जून) अहमदाबमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम फेरीसाठीचा (MI vs PBKS) मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स या दोन्ही संघाचासामना पार पडला. पावसाने हजेरी लावली असतानाही हा सामना उशिरा सुरू करून पूर्ण ओव्हर खेळवण्यात आल्या. पंजाबच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय नाणेफेक जिंकून घेतला. पण तरी सुद्धा मुंबईची धावसंख्या पंजाबला रोखता आली नाही. मुंबईने 203 धावा करत पंजाबसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. सुरुवातीला पंजाबचा संघ हे आव्हान पेलू शकणार नाही, असे वाटले होते. पण कर्णधार श्रेयस अय्यर याने अत्यंत शांततेत हे आव्हान स्वीकारत मुंबईला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे पाच विकेट्सनी पंजाबने मुंबईवर दणदणीत विजय मिळवला. पण महत्त्वाची बाब म्हणजे, तब्बल 11 वर्षांनंतर पंजाबच्या संघाला अंतिम फेरीत जागा मिळवता आली आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्सचा सामना खेळवला गेला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने हा सामना खेळला. पंजाबने नाणेफेक जिंकल्यामुळे मुंबईला प्रथम फलंदाजी करावी लागली. पण मुंबईनेही 203 धावा करत पंजाबसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. पंजाबने 204 धावांचे आव्हान 6 बॉल राखून 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सामन्यात कर्णधार म्हणून श्रेयसने अप्रतिम खेळी केली. श्रेयसने नाबाद 87 धावा केल्या. पंजाबची 2014 नंतर ही पहिली वेळ फायनलमध्ये पोहचण्याची ठरली. तर मुंबई 204 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरली. मुंबईच्या पराभवाचा धक्का कर्णधार हार्दिकला सहन झाला नाही. त्यामुळे हार्दिक मैदानात भावूक झाला. आपल्या नेतृत्वात मुंबईला अंतिम फेरीत पोहचवू न शकल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. तर दुसऱ्या बाजूला मैदानाबाहेर बसलेल्या रोहित शर्मा याचाही चेहरा पडला.

मुंबईच्या फलंदाजांनी 203 धावा केल्या. मुंबईने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या डावात जेव्हा जेव्हा 200 पेक्षा अधिक धावा केल्या तेव्हा तेव्हा विजय मिळवला. त्यामुळे मुंबई हा सामनाही जिंकेल, अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांना पंजाबच्या विजयाचा रथ रोखता आला नाही. तसेच गोलंदाजांना फिल्डिंगमधूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. नेहल वढेरा याची सोपी कॅच ट्रेंट बोल्ट याने निर्णायक क्षणी सोडली. मुंबईने मोठी संधी गमावली. बोल्टने कॅच सोडणे हा पंजाबसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरले, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. तर, महत्त्वाची गोष्ट म्हणडजे, या सामन्यात जसप्रीत बुमराहला आपली फारशी कमाल दाखवता आली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, बुमराहला या सामन्यात एकही विकेट घेता आलेली नाही. ज्यामुळे याचाही फायदा पंजाबच्या संघाला झाला आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img