वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagavane Case) गेल्या काही दिवसांपासून फरार असणारा निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याला काल अटक करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळमधून त्याला अटक केली होती. यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस सुनावली आहे. निलेश चव्हाण 23 मे पासून फरार होता. आता पोलिस निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणले. पुणे सत्र न्यायालयात 28 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी या प्रकरणात निलेश चव्हाणाला आरोपी करणे चुकीचे आहे कारण त्याने बाळाचा सांभाळ केला आहे. असा युक्तीवाद केला होता.
Vaishnavi Hagavane Case निलेश चव्हाण असा झााला गजाआड
पोलिसांना तपासात माहिती मिळाली की, निलेश चव्हाण 25 मे रोजी दिल्लीहून गोरखपूर दरम्यान खासगी बसने गेला होता. त्याचं लोकेशन सुद्धा पोलीस तपासात ट्रेस झालं होतं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर यात्री खात्री सुद्धा (Pune Crime) झाली. परंतु गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर निलेश नेमका कुठे गेला? याचा काही तपास लागत नव्हता. त्यानंतर पुन्हा शेकडो सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यानंतर तो नेपाळला गेल्याचं स्पष्ट झालं.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 30 मे रोजी भारत नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथे निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली होती. पुणे पोलिसांची तीन पथके त्याच्या मागावर होती. मधल्या काळात निलेश चव्हाणचा पुणे, मुंबई, कोकण, कर्नाटक, गोवा या राज्यांत देखील शोध घेतला जात होता. त्याच्या संपर्कातील अनेक मित्र आणि नातेवाइकांची चौकशी केली होती. अखेर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले अन् पोलीस नीलेश चव्हाणपर्यंत पोहोचण्यात यशस्वी देखील ठरले.
Vaishnavi Hagavane Case प्रकरण काय?
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. यानंतर वैष्णवीने असं टोकाचं पाऊल उचललं, यामागे हुंड्यासाठी झालेला छळ, कौटुंबिक हिंसाचार, असे आरोप करण्यात आले होते. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर दोघंही फरार झाले होते. त्यांना आठ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली होती. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्यानंतरही आणखी पैशांसाठी वैष्णवीचा छळ सुरु होता असा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडून करण्यात आला आहे