30.8 C
New York

Marathwada Rain Update : मराठवाड्याला वळवाच्या पावसाचा तडाखा; 27 जण दगावले, तर 392 जनावरांचा मृत्यू

Published:

राज्यात अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून चांगलाच (Marathwada Rain Update) धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस बरसल्याचं दिसून आलंय. विशेषत: मराठवाड्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून अवकाळी पावसामुळे आत्तापर्यंत मराठ्यावाड्यातील 27 जणांचा मृत्यू झाला असून 392 जनावरे दगावली आहेत. बीडमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे.

मराठवाड्यात वीज पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने वीज अटकाव यंत्रे वाढवण्याच्या सूचना मान्सूनपूर्व बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत. सध्या मराठवाड्यात 503 वीज अटकाव यंत्रे आहेत. बीडमध्ये त्यातील फक्त 308 वीज अटकाव यंत्रे आहेत.

मान्सूनपूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी घेतली. या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 तर जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन आणि धाराशिव परभणीमध्ये चार वीज अटकाव यंत्रे आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने वीज अटकाव यंत्राची मागणी जोर धरु लागली आहे.

मराठवाड्यात वीज अटकाव यंत्रे वीज पडून होत असलेले मृत्यू कमी करायचे असतील तर वीज वाढवाी लागणार आहेत. यासोबतच दामिनी आणि सचेत हे दोन अॅप मोबाईलमध्ये घेतल्यास वीज पडू शकणार आहे की नाही याचा अंदाज मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img