हवामान विभागाने अरबी समुद्रात (Arabian Sea) 21 मेपासून महाराष्ट्र आणि गोव्या जवळ कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तो अधिक तीव्र 24 मेपर्यंत होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. थेट धोका राज्याच्या किनाऱ्याला नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यगड (Raigad) , रत्नागिरी (Ratnagiri), मुंबई (Mumbai) आणि पालघरजवळ (Palghar) 22 ते 24 मे दरम्यान रासमुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. तसेच 21 ते 24 मे दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाकडून मच्छीमारांसाठी काही सूचना देखील देण्यात आले आहे.
Arabian Sea 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
– हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
-स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
-खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
-लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
-सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
- किनाऱ्यावरील होड्या व बोटी संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
– स्वतःची व इतरांची सुरक्षितता मासेमारी टाळून समुद्र खवळलेला असताना जपावी.
तर दुसरीकडे मंगळवारी (20 मे) रोजी पुणेसह, मुंबई, अहिल्यानगर येथे अवकाळी पाऊस झाल्याने अनेकांचे हाल झाले आहे. पुण्यातील विमानतळ परिसर, सिंहगड रोडवर अवकाळी पावसामुळे ट्राफिक पाहायला मिळाली तर दुसरीकडे अहिल्यानगरच्या अनेक तालुक्यांसह शहरात देखील विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.
मुंबईतील उपनगराच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनपूर्व पाऊस विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.