14.6 C
New York

Operation Sindoor : भारताकडून पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’; मोठा शत्रू हाफिज सईद अन् मसूद अजहरचा खात्मा?

Published:

हलगाम दहशतवादी हल्ल्याचा अखेर भारताने बदला घेतला आहे. सर्व भारतीय या कारवाईची आतुरतेने वाट पाहत होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. (Operation Sindoor) भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य करत हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्यात त्याचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईद आणि मसूद अजहर मारले गेल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा कुठंही झालेली नाही.

भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे.त्याचे मुख्यालय आणि मदरसा हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. जैशचे 50 दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले आहेत. याशिवाय, भारताने मुरीदके येथील लष्करच्या तळाला उद्ध्वस्त केलं आहे. या हल्ल्यात लष्कर आणि जैशचे अनेक टॉप कमांडर ठार झाले आहेत. मात्र, मसूद अजहर आणि हाफिज सईद मारलेया हल्ल्यात गेल्याची माहिती मिळालेली नाही.

Operation Sindoor पाकिस्तान पंतप्रधानांची बेठक

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या हल्ल्यानंतर तातडीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे. भारताने आमच्यावर युद्ध करण्यास भाग पाडलं आहे. आम्हाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे असं ते या बैठकीत म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img