महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ( 5 मे) जाहीर झाला असून 91.88 टक्के निकाल लागला आहे. नेहमीप्रमाणे मुलीच अव्वल ठरल्या असून नऊ विभागीय मंडळातून दरवर्षीमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. तर सर्वाधिक कमी टक्केवारी लवातूर विभागाची आहे. 96.74 कोकणाचा निकाल तर लातूरचा निकाल 89.46 इतका आहे.
12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल चेक करता येणार आहे. या परीक्षेतील शाखानिहाय निकालही जाहीर झाला आहे. 97.35 टक्के विज्ञान शाखेचा निकाल तर 80.53 टक्के कला शाखेचा निकाल आणि 92.68 टक्के इतका वाणिज्य ( कॉमर्स) विभागाचा निकाल लागला आहे. तसेच 93.26 टक्के व्यवसाय शाखेचा निकाल आणि 82.03 इतकाआयटीआयचा निकाल लागला आहे.
12th Result 2025 विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे
विज्ञान शाखा
नोंदणी – 7 लाख 37 हजार 205
परीक्षेला बसले – 7 लाख 35 हजार 3
उत्तीर्ण – 7 लाख 15 हजार 595 पास झाले.
टक्केवारी – 97.35 टक्के
कला शाखा –
नोंदणी – 3 लाख 54 हजार 699.
परीक्षेला बसले – 3 लाख 49 हजार 696
उत्तीर्ण – 2 लाख 81 हजार 606
टक्केवारी – 80.52 टक्के
वाणिज्य विभाग
नोंदणी – ३ लाख ७६६
परीक्षेला बसले – २ लाख ९९ हजार ५२७
उत्तीर्ण – २ लाख ७७ हजार ६२९
टक्केवारी – ९२.६८
व्यवसाय
नोंदणी – ३० हजार १७
परीक्षेला बसले – २९ हजार ३६३
उत्तीर्ण – २४ हजार ४५०
टक्केवारी – ९३.२६
आयटीआय
नोंदणी – ४ हजार ३९८
परीक्षेला बसले – ४३८०
उत्तीर्ण – ३५९३
टक्केवारी – ८२.०३
नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.८८ टक्के