इयत्ता १२ वी महाराष्ट्र बोर्डचा निकाल जाहीर दुपारी एक वाजता (HSC Result 2025) होणार असला तरी तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये परिक्षार्थींसह उत्तीर्ण झालेल्यांची आकडेवारी सांगण्यात आली आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
14 लाखस २७ हजार 85 विद्यार्थ्यांनी परिक्षेला अर्ज केला होता. त्यापैकी प्रत्यक्ष 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी परिक्षेला बसले होते.13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी त्यामधून उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 टक्के इतकी आहे.
खासगी विद्यार्थ्यांची एकून संख्या 36 हजार 136 इतकी होती. त्यामध्ये 35 हजार 697 विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यामधून 29 हजार 892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 73.73 टक्के इतकी आहे. त्याचबरोबर सर्व शाखांमधून एकून 42 हजार 388 विद्यार्थ्यांनी नोंदनी केली होती. त्यापैकी 42 हजार 24 विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेला बसले होते. त्यामधून 15 हजार 8 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65 टक्के इतकी आहे.
HSC Result 2025 गेल्या वर्षीचा काय होता निकाल?
गेल्यावर्षी विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम, आयटीआय या अभ्यासक्रमाच्या एकूण 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे 93.37 टक्के इतकी एकूण उत्तीर्णांची टक्केवारी नोंदवण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळात राज्यभर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली होती.
HSC Result 2025 गेल्यावर्षीचा निकाल
विभागनिहाय निकाल पाहा
कोकण : 97.51 टक्के
पुणे : 94.44 टक्के
कोल्हापूर : 94.24 टक्के
अमरावती : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
नाशिक : 94.71 टक्के
लातूर : 92.36 टक्के
नागपूर : 93.12 टक्के