28.5 C
New York

Maharashtra Weather : मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र तापला, राज्यातील तापमानाचा पारा वाढला

Published:

सकाळच्या वेळी राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरणात (Maharashtra Weather) गारवा जाणवत असला तरी 10 वाजेनंतर मात्र सकाळी गरमी जाणवण्यास सुरुवात होत आहे. सध्या राज्यातील हवामान कोरडे असून तापमानाच्या पाऱ्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 30 अंश पार गेला आहे. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्हे तापू लागले आहेत. कारण शुक्रवारी (ता. 14 फेब्रुवारी) पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. मराठवाड्याचे तापमानाही 35 ते 38 अंशापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात जर का उकाडा जाणवत असेल तर यावेळी मे महिन्यात उन्हाच्या किती झळा सोसाव्या लागतील? याची चिंता नागरिकांना सतावू लागली आहे. (Maharashtra Weather Central and West Zone heats up, mercury rises in the state)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ क्षेत्रामध्ये उकाडा सुरू झाला असून, इथेही तापमान 35 ते 37 अंशांदरम्यान आहे. राज्यातील सर्वाधिक तामपानाची नोंद सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. सोलापुरात 36.6 अंश सेल्सिअस आणि रत्नागिरीत 37 अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यस्थानमधील पूर्वेकडील क्षेत्रांवर पुन्हा एकदा शीतलहरींचा परिणाम दिसून येणार आहे. तर, अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्याच्या पर्वतीय भागांमध्ये थंड वारे आणखी तीव्र होणार असून हीमवृष्टीत वाढ होणार आहे. मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र तापमानवाढ पाहायला मिळेल. वातावरणातील बदलामुळे सद्यस्थितीला कमाल आणि किमान तापमानात 17 ते 21 अंशांची तफावत दिसत असून, आकडेवारीतील हा फरक दीर्घकाळासाठी कायम राहण्याच अंदाज आहे.

दिल्लीचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स कायम, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

मुंबईतही रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवसा मात्र उन्हाचे चटके बसत आहेत. शुक्रवारी मुंबईतील सांताक्रूझ येथे कमाल तापमान 35.7 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात येत्या चार दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत आणि किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवले आहे. पुढील काही दिवसांतही राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाच्या तीव्रतेत आणखी वाढ होऊ शकते. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने तापमानवाढ जाणवते.सध्या राज्यात कुठेही पावसाचाी शक्यता नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img