संपूर्ण राज्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.(Exams) नदी, नाले ओसंडून वाहात आहेत. (Mumbai university) मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर पुढील काही तासांत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून स्थानिक प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे.
मुंबई, उपनगर परिसरातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचा असे असतानच आता मोठा निर्णय समोर आला आहे. विद्यापीठाने मुंबईतील पावसाची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थीहित व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतील अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता 19 ऑगस्ट 2025 रोजीच्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीठाच्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा नियोजित वेळेनुसार 23 ऑगस्ट 2025 रोजी सुधारीत वेळापत्रकानुसार आता होणार आहेत.
पीआर सत्र ३, टेलेव्हिजन स्टडीज सत्र ३, इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र ३, फिल्म स्टडीज सत्र ३, एमपीएड सत्र २, बीपीएड सत्र २मास्टर ऑफ आर्ट कम्युनिकेशन जर्नालिझम सत्र ३, , बीफार्म सत्र २, एमफार्म सत्र २, एमएड सत्र २, एमकॉम (ईकॉमर्स) सत्र ४, एमए (सीडीओई), बीई ( कम्प्युटर सायन्स अँड डिजाईन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) यासह अन्य परीक्षांचा समावेश 19 ऑगस्ट रोजी आयोजित असलेल्या परीक्षांमध्ये आहे. या परीक्षांना बसणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
दुसरीकडे पुढील 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच मुंबईला रेड अलर्ट येत्या 48 तासांसाठी जारी करण्यात आलाय. पावसाने उपनगरांतही झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबई, पालघर जिल्हा, ठाणे महापालिका हद्द, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली इथल्या शाळांना 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्यांनी तसेच मुख्याध्यापकांनी अन्य जिल्ह्यांतील तसेच गाव खेड्यातील शाळांबाबत तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, राज्य सरकारने असे सांगितले आहे.