चांगलाच मुंबईतील कबूतरखान्याचा वाद चिघळला (Kabutar Khana Dadar) आहे. कबूतरखाना बंदीच्या समर्थनासाठी आज मराठी एकीकरण समितीन आंदोलन पुकारलं होतं. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी (Mumbai Police) दिली नव्हती. समितीला नोटीसा देण्यात आल्या होत्या. समितीचे कार्यकर्ते तरी देखील आंदोलनस्थळी जमा होऊ लागले होते. त्यानंतर पोलिसांनीही आक्रमक होत आंदोलकांची धरपकड सुरू केली. यामुळे कबूतरखान्याचा वाद आता जास्तच चिघळल्याचे अधोरेखित झाले आहे. समितीने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडून होत असलेल्या या कारवाईवर आंदोलकांनी संताप व्यक्त केला. कबूतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही. हा सामाजिक मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्याला जातीय रंग देऊ नका. याआधी जैन समाजानेही आंदोलन केलं होतं मग त्या समाजाच्या आंदोलकांवर कारवाई केली का? असा सवाल आंदोलकांनी पोलिसांनी विचारला. पोलिसांच्या या कारवाईमुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Kabutar Khana Dadar पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
दादर येथील कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे. कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने आजचे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आंदोलक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी या परिसरातील जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांना या आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. मला त्यावर काहीही बोलायचे नाही असे लोढा यांनी सांगितले.