अनेकदा आपल्याला अचानक कोणताही खास कारण नसताना चिडचिड किंवा राग येतो. पण ही केवळ वागणुकीशी संबंधित गोष्ट नसून, यामागे शरीरात रक्तातील साखरेतील बदल कारणीभूत असू शकतात.
मेंदूच्या चांगल्या कार्यासाठी आणि मूड संतुलित राहण्यासाठी ग्लुकोज म्हणजेच साखर खूप महत्त्वाची असते. जेव्हा रक्तातील साखर स्थिर असते, तेव्हा आपल्याला उत्साही आणि स्थिर वाटतं. पण साखरेची पातळी अचानक घसरली (हायपोग्लायसेमिया) तर राग, अस्वस्थपणा, चिंता वाटू शकते.
अशा वेळी शरीर तणावग्रस्त होतं आणि अॅड्रेनालिन, कॉर्टिसोलसारखी हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे राग येतो. म्हणूनच अनेकांना भूक लागली की चिडचिड होते – ज्याला हल्ली “हंग्री” असंही म्हटलं जातं.
फक्त कमी साखरच नव्हे, तर साखरेची पातळी जास्त झाली (हायपरग्लायसेमिया) तरी मूडवर परिणाम होतो. यामुळे थकवा, गोंधळ, लक्ष न लागणे, आणि चिडचिड वाढते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये हे बदल अधिक प्रमाणात दिसतात.
जर खाण्याच्या वेळा ठरलेल्या नसतील, खूप वेळ उपाशी राहत असाल किंवा खूप गोड खात असाल, तर रक्तातील साखरेचा तोल बिघडतो.
उपाय काय?
– वेळच्या वेळी थोडं थोडं पण संतुलित खाणं
– आहारात प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स असणं
– गोड आणि प्रोसेस्ड अन्न टाळणं
– नियमित व्यायाम
– तणाव कमी करणं आणि चांगली झोप घेणं