21.8 C
New York

Raj Thackeray : 5 जुलैला होणार मोर्चा रद्द… पण ; राज ठाकरेंची घोषणा

Published:

महाराष्ट्र सरकारने पहिली ते चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत घेतली. हिंदीसक्तीचा जीआर (Hindi GR) रद्द करायला भाग पाडलं. त्यासाठी महाराष्ट्रातीन जनेतचं त्यांनी अभिनंदन केलं. तसेच पाच जुलैला होणार मोर्चा रद्द केला असून त्याऐवजी विजयी मेळावा घेणार अस त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोतलाना ते म्हणाले की, काल सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले किंवा जीआर रद्द करायला भाग पाडलं. त्यासाठी महाराष्ट्रातीन जनेतचं मी अभिनंदन करेनं. खरंतर काही गरज नसताना हा विषय आला होता. तो विषय आता रद्द झाला आहे. यासाठी मराठीजनांचे आभार मानेनच. पण, मराठी वृत्तपत्राचे संपादक आणि पत्रकार, मराठी साहित्यिक आणि काही मोजक्या कलावंताचेही आभार मानतो. गरज नसताना सरकारने हा विषयी पुढे आणला होता, असं ते म्हणाले.

Raj Thackeray …तर मराठी माणसाची ताकत कळली असती

ते म्हणाले, गरज नसताना हिंदीसक्तीचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही प्रथम विरोध केला. जसंजसं वातावरण तापायला लागलं तसतसे महाराष्ट्रातील इतरही राजकीय पक्ष उद्धव ठाकरेंची सेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सरकाच्या निर्णयाला विरोध केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही 5 जुलैला मोर्चा आयोजित केला होता. हा मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यती असा निघाला असता. 70.75 वर्षांच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. या मोर्चात मराठी माणसाची ताकद काय आहे, हे सरकारला कळलं असतं, असं ते म्हणाले.

Raj Thackeray हिंदी भाषेचं प्रकरण सरकारच्या अंगाशी आलं

पुढं राज ठाकरे म्हणाले, माझ्याकडे दादा भुसे तेव्हा मी त्यांनी या विषयावर कोणताही तडजोड होणार नाही, हे स्पष्ट सांगितलं होतं. हे स्लो पॉयझनिंग आहे आणि हा प्रयत्न त्यांनी त्यांनी करून पाहिला. मात्र, ते सरकारच्या अंगाशी आलं आहे. आता ते समिती वगैरे नेमत आहेत. सरकारने समिती नेमावी किंवा काही करावं, आमचं त्याच्याशी घेणंदेणं नाही. मात्र, पुन्हा ही गोष्ट होणार नाही एवढं सरकारने नक्की लक्षात ठेवावं. असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, असंही राज ठाकरेंनी ठणकावलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img