21.8 C
New York

Rohit Pawar : हिंदी सक्तीचा दिल्लीचा आदेश घाबरून मागे घेतला; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

Published:

राज्यभरातून हिंदी भाषा सक्तीला विरोध होत असतानाच हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द महायुती सरकारने केला आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टोलेबाजी करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टोला लगावला आहे.

Rohit Pawar काय म्हणाले रोहित पवार?

हिंदी सक्ती विरूद्धचे आंदोलन हा डाव नव्हता. मराठीच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसंच त्यांना पाठिंबा देणारे इतर सर्व पक्ष त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल इतर छोटे मोठे सर्व पक्ष असतील हे मिळून 5 तारखेला मुंबईमध्ये एक मोठा मेळावा एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार होते.

पण हे सरकार घाबरलं आहे. सरकारने हिंदी सक्तीचा जीआर काल 29 जून रोजी घाबरून मागे घेतला. त्यामुळे सर्वांना मानावे लागेल की, मराठी माणूस स्वतःच्या हितासाठी जेव्हा एकत्रित येतो. स्वतःच्या स्वाभिमानासाठी एकत्रित येतो. तेव्हा मराठी विरोधात असणारे लोक हे महाराष्ट्राच्या विरोधात असावे लोकांना माघारी घ्यावीच लागते. दिल्लीवरचा जो आदेश आला होता आणि तो जीआर मध्ये कन्व्हर्ट करून तो त्या ठिकाणी लागू केला होता. तो मागे घेतला मग मराठी माणसांचा तो विजय आहे.

मराठी मीडियाचे पत्रकारांचे पण याच्याच बरोबर खास करून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ते सुद्धा मराठीच्या बाजूनी राहिले महाराष्ट्राच्या बाजूने राहिले.एक चांगली पत्रकारिता ठराविक वगळता सर्व मराठी पत्रकारांनी चांगली पत्रकारिता ही अख्ख्या देशाला दाखवून दिली. यासाठी त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. फक्त विनंती एवढीच आहे. पाच तारखेला उद्धव ठाकरे साहेब विजय सभा घेण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहेत. राज ठाकरे सुद्धा त्या सभेसाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा तो कार्यक्रम नसला तरी एकत्रित घेऊन ती विजयाची सभा ही घ्यावी. असं आमच्यासारख्याला सुद्धा वाटतं. असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर टोलेबाजी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img