19.5 C
New York

Devendra Fadnavis : शेतकरी कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

Published:

आळंदीत आज माध्यम प्रतिनिधींना विश्वस्तांनी खूप खराब वागणूक दिली. हाकलण्याचा प्रयत्न झाला. त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलले. “अशा गोष्टी पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेऊ. अनेकवेळा स्ट्रेस, टेन्शनमध्ये अशा गोष्टी घडतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण पुन्हा त्या घडू नयेत असा प्रयत्न आम्ही करु” असं म्हणाले. काही निकष अशा संस्थांमध्ये माणसं नेमताना असतात, व्हिडिओ व्हायरल होतायत, पत्रकारांनी तुम्हालाही वाईट वाटेल, असा प्रश्न विचारला. देवेंद्र फडणवीस त्यावर म्हणाले की, सरकार या नेमणूका करत नाही. या नेमणूका ज्यूडिशियल ऑफिसरच्या माध्यमातून होतात. ’

आळंदीत कत्तलखान्याच्या आरक्षणाच्या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. “आळंदीचा जो विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्यात आळंदीत एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. मी स्वत: कत्तलखान्याचे आरक्षण वगळण्याचे आदेश दिले आहेत. वारकरी संप्रदाय, वारकरी नेत्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करु इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलाखाना करु दिला जाणार नाही” असं मुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadnavis शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर काय उत्तर?

सध्या धरणं लवकर भरतायत. सांगली-कोल्हापूरला फटका बसतोय, सरकराच नियोजन काय आहे? देवेंद्र फडणवीस या प्रश्नावर म्हणाले की, “परिस्थितीकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत. विसर्ग कधी सुरु करायचा, कधी बंद करायचा याचं नियोजन करण्यात आलं आहे. बाजूच्या राज्यांशी समन्वय ठेवण्यात येत आहे. त्या राज्यांमध्ये आपला एक इंजिनिअर बसलेला आहे. पावसाळ्यात तो तिथेच असतो. त्याच्या माध्यमातून समन्वय ठेऊन आहोत. अर्थात निसर्गाचा भरवसा देता येणार नाही. पण आपल्या बाजूने आपण नियोजन केलं आहे” शेतकरी कर्ज माफीच्या मुद्यावरही त्याचवेळीते बोलले. “सरकार दिलेला एकही शब्द फिरवणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणालेसरकार कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेईल”.

Devendra Fadnavis ती क्षमता योगात आहे

“वारी ही महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी वारीला पायी चालत जातात. ते सर्व वारकरी आज पुण्यात थांबले आहेत. आम्ही या कार्यक्रमाशी जोडून आज योगाभ्यास केला. पुण्यातील महाविद्यालय यात सहभागी झाली होती. भव्य कार्यक्रम झाला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो.आंतरराष्ट्रीय स्तरावर ती क्षमता योगात आहे. आज मोदीजींमुळे योगासनांना स्वीकारण्यात आलय”

Devendra Fadnavis पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला पण अवस्था खराब

पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला पण विभागांची अवस्था फार चांगली नाही, प्राध्यापकाची कमतरता आहे, याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष वेधलं. “पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाच मनापासून अभिनंदन करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल त्या दिशेने सुरु आहे.पहिल्या 600 विद्यापीठात आज पुणे विद्यापीठ जगातल्या आहे. अपेक्षा मला आहे की, पहिल्या 500 विद्यापीठात पुढच्यावर्षी किंवा दोन वर्षात आपली विद्यापीठं असतील. जगातल्या 500 विद्यापीठांना पहिल्या मान असतो. इथले कुलगुरु, व्यवस्थापन परिषद, सिनेटर, प्राध्यापकांच मनापासून अभिनंदन करतो. जे तुम्ही डेफिसिट सांगितल, त्या बद्दल उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रकारच्या मान्यता दिल्या आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img