ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) मात्र, वेगळाच सूर आळवला आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे पवारांनी म्हटले आहे. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे बळआगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पवारांच्या (Sharad Pawar) या विधानामुळे चांगलेच वाढले आहे. पवारांचं विधान जरी ठाकरे गटाला बळ देणारं असलं तरी आगामी काळात पालिका निवडणुकांमध्ये कोण कुणासोबत जातं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Sharad Pawar काय म्हणाले पवार?
आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. पवार त्यावर बोलताना म्हणाले की, मुंबईत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेची ताकद आम्हा सर्वांमध्ये जास्त आहे. त्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं का नाही ते बसून ठरवू. आम्ही अद्याप लढण्याबाबत चर्चा केलेली नसल्याचेही पवार म्हणाले. पुढे शरद पवार म्हणालेत त्यामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, आम्ही स्वतः आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसू असंही . एकत्र पण निवडणूक लढण्याची इच्छा आहे, असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. Sharad Pawar On BMC Election Uddhav Thackeray
Sharad Pawar ठाकरे बंधू एकत्र येण्याच्याही चर्चा
एकीकडे पालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकड पवारांनी मुंबईत ठाकरेंची ताकद मविआतील अन्य पक्षांच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले आहे. तर, ठाकरेंनी काल (दि.19) वर्धापनदिनाच्या सोहळ्यात मुंबई यांच्या मालकाच्या घशात घालण्यासाठी मराठी माणसाला एकत्र येऊ दिलं जात नाही. पण राज्याच्या जे मनात आहे, तुमच्या जे मनात आहे तेच मी करणार असल्याचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत. त्यामुळे जरी पवारांनी ठाकरेंची मुंबईत ताकद जास्त असल्याचे म्हटले असले तरी, आता मुंबईत मविआ पालिका निवडणुका एकत्र लढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Sharad Pawar हिंदी सक्तीच्या वादावर शरद पवारांचं मोठ विधान
राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार करत मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषादेखील पहिलीपासून सक्तीची करण्यात येईल, असं सांगितलं होतं. (Hindi) यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या टीकेनंतर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असं स्पष्ट केलं होते. आता यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदीची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेच द्वेष करणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. फक्त सक्ती असू नये. शिक्षकांना हवं ते त्यांनी करावं. जे मार्गदर्शन पालकांना त्यांनी केले त्यानुसार निर्णय घ्यावा. हिंदीची सक्ती नको. शरद पवार म्हणाले, एखाद्याला येत असेल, तो शिकत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाही.
नवीन जीआर राज्य सरकारने काढत केवळ 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा ‘अनिवार्य’ शब्द वगळत असून, शिकता येणार, असं नमूद केले आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वीसाठी हिंदी तृतीय भाषा असल्याचा उल्लेख शासन निर्णयात केला गेला आहे. यावरुन सध्या राजकारण तापलं आहे.