24.3 C
New York

Indrayani River Accident : मावळमधील इंद्रायणीवरील पूल कोसळला; वाहून गोलेल्यांपैकी 5 जणांचा मृत्य

Published:

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तळेगाव दाभाडे जवळीस प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. यामध्ये पर्यटनासाठी आलेले 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.तसेच 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

रविवार असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते. मात्र अचानक हा जुना पूल कोसळल्याने अनेक जण नदीत बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये स्थानिक किती होते आणि पर्यटक किती होते. याची संपुर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते…

घटनेची माहिती मिळतातच अग्निशमनदल, पोलिस आणि एमडीआरफचे बचाव पथक हे बचाव कार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच वाहून गेलेल्या पर्यकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पुण्यातील विविध पर्यटन स्थळी पावसाळी सुरू झाला की, पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र मावळ येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये इंद्रायणी नदीचं मोठं पात्र याठिकाणी असल्याने पर्यटकांच्या जीवाला जास्त धोका आहे. तसेच हा पूल जुन्या अवस्थेत होता.मात्र लोक मोठ्या प्रमाणात त्यावरून ये जा करत होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img