32.6 C
New York

Plane Crash : दादरी ते अहमदाबाद… देशातील दहा मोठे विमान अपघात

Published:

विमान प्रवास सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. (Plane Crash) अपघात होऊ नये म्हणून सुरक्षाचे मापदंड पाळले जातात. परंतु एखादा अपघात झाल्यास शेकडो प्रवासांना जीवन गमवावा लागतो. अहमदाबादहून (Ahmedabad ) गुरुवारीच एअर इंडियाचे (Air India) बोईंग 787-8 ड्रीमलाइनर हे विमान लंडनला जाणारे कोसळले. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात हे विमान एका इमारतीवर कोसळले. बारा क्रू मेंबर व 230 प्रवासांचा त्यात मृत्यू झालाय. इतिहास पाहिला तर देशातील आणि जगातील विमान अपघाताचा हा सर्वात मोठा विमान अपघात आहे. सर्वात मोठे विमान अपघात देशातील कुठे आणि कसे झाले ? देशातील दहा मोठे विमान अपघातांबाबत जाणून घेऊया…

Plane Crash 1996 : चरखी-दादरी विमान अपघात, 349 मृत्यू

देशातील सर्वात मोठा विमान अपघात 12 नोव्हेंबर 1996 रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे घडला होता. सौदी अरेबियन एअरलाईन्सचे 763 आणि कझाकस्तान एअरलाईन्सचं 1907 ही दोन विमाने एकाशात एकमेकांशी धडकले. या अपघातात दोन्ही विमानांमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण 349 जणांचा जीव गेला होता.

Plane Crash 1978 मुंबईत 213 जणांचा मृत्यू

1978 च्या जानेवारीला नवववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत एक भीषण विमान अपघात झाला होता. एअर इंडियाचं बोईंग 747-237B हे विमान या अपघातात कोसळले. या विमानात प्रवास करणारे सर्व प्रवासी आणि कर्मचारी असा 213 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 190 प्रवासी आणि 23 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Plane Crash 2010 मध्ये मंगलोर अपघात 158 जणांचा मृत्यू

एअर इंडियाचं IX-812 हे विमान 22 मे 2010 रोजी मंगलोरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले होते. दुबईहून मंगलोरला बोईंग कंपनीचं 737-800 हे विमान येत होते. दुबईला नोकरीला गेलेले भारतीय मायदेशी परतत होते. मंगलोर येथे टेबलटॉप रनवे होता. धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर ते व्यवस्थित लँड होऊ शकले नाही. ते विमान खोल खड्ड्यात कोसळून विमानाचा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात 158 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात आठ जण बचावले होते.

Plane Crash अहमदाबादमध्ये विमान कोसळून 133 जणांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये 19 ऑक्टोबर 1988 रोजी 37 वर्षांपूर्वी भयंकर विमान अपघात झाला होता. विमानतळाजवळच इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. त्यात 133 जणांचा मृत्यू झाला होता.सकाळी सहा वाजता बोइंग 737-200 हे विमान मुंबईवरून अहमदाबादला जात होते. अहमदाबाद विमानतळावरून कमी दृश्यमानतेमुळे पायलटने हवामानाची माहिती मागितली. पण विमान उतरविण्याची परवानगी मागितली नाही. पण विमान चिलोडा कोतारपूरजवळ सकाळी 6.53 वाजता एका झाडावर आणि वीज ट्रान्समिशन टॉवरवर आदळले. तेव्हा विमान एक हजार फूट उंचीवर होते. त्यात सर्वाच 133 जणांचा मृत्यू झाला.

Plane Crash 7 जुलै 1962 मध्ये 94 जणांचा मृत्यू

एलिटालिया फ्लाइट 777 7 जुलै 1962 मध्ये क्रॅश झाले होते. हे विमान ऑस्ट्रेलियातील सिडनीहून रोमकडे जाते होते. हे विमान भरकटले. मुंबईपासून सुमारे 84 किलोमीटर दूर जुन्नर येथे डोंगरला धडकले. त्यात 94 जणांचे मृत्यू झाला होता. या विमानात विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात होते.

Plane Crash 14 जून 1972 मध्ये 82 जणांचा मृत्यू

हरियाणातील पालम विमानतळ येथे 14 जून 1972 मध्ये जपान एअरलाइन्सचे विमान कोसळले होते.87 पैकी 85 जणांचा त्यात मृत्यू झाला होता. जमिनीवर असलेल्या तीन जणांनाही त्यात आपले प्राण गमवावे लागले. जपान आणि भारताने या घटनेची वेगवेगळी कारणे दिली. परंतु खरे कारण समोर आलेच नाही.

Plane Crash 12 ऑक्टोबर 1976 मध्ये 95 जणांचा मत्यू

12 ऑक्टोबर 1976 मध्ये मुंबईमध्ये विमान अपघातात 95 जणांचा मृत्यू झाला होता. इंडियन एअरलाइन्स प्लॉइट 171 हे मुंबईवरून चेन्नईला जात होते.
बोईंग विमानाने टेकऑफ गेतल्यानंतर इंजिनमध्ये लगेचच बिघाड झाला. त्यावेळी पायलटने आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. पण विमानाला आग लागली आणि पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले. या घटनेत कोणीही वाचले नाही, सर्व जणांचे मृत्यू झाले.

Plane Crash बंगळुरू विमानतळ अपघातात 92 जणांचा मृत्यू

बंगळुरूत 14 फेब्रुवारी 1990 रोजी विमान अपघात झाला होता. मुंबईहून बंगळुरूला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे एअरबस विमान विमानतळावर उतरताना जवळच्या गोल्फ कोर्समध्ये कोसळले. विमानातील 146 जणांपैकी 92 जणांचा मृत्यू झाला. पायलटच्या चुकीच्या लँडिंगमध्ये हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

Plane Crash संभाजीनगरमधील विमान अपघातात 55 जणांचा मृत्यू

औरंगाबाद व आताच्या संभाजीनगरमध्ये 26 एप्रिल 1993 रोजी पूर्वीच्या विमान अपघात झाला होता. इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 491 औरंगाबादहून मुंबईला निघाले. ते बोईंग 737 ए आठ विमान होते. हे विमान उड्डाण घेताच विमानतळाजवळ कोसळले. हे विमान धावपट्टीच्या शेवटी उभ्या असलेल्या लॉरीशी आदळले. तपासास असे उघडकीस आले की पायलटने टेकऑफबद्दल चुकीचा अंदाज लावल्याने हा अपघात झाला आहे.

Plane Crash 12 जून 2025-242 जणांचा मृत्यू

देशातील सर्वात मोठा दोन नंबरचा अपघात 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील विमान अपघात हा आहे. विशेष म्हणजे पहिला अपघात दोन विदेशी एअरलाइन्समध्ये हरियाणा येथे झाला होता. त्यात 349 जणांचा आकाशामध्ये मृत्यू झाला होता. अहमदाबादमधील अपघातात विमानामधील 230 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाचा हा आतापर्यंतच सर्वात मोठा अपघात आहे. प्रवासांची सुरक्षेसाठी, विमान उड्डाणांबाबच या अपघातानंतर दक्षता घेण्यासाठी सरकारला पावले उचलावे लागणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img