28.5 C
New York

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अन् …, जयंत पाटलांची पवारांकडे मागणी

Published:

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 26वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्स ऍप स्टेटसची चर्चा असताना अजित पवार यांच्यासोबत एकत्र येण्यावर काय बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. पण याआधीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक मोठी मागणी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे केली. “शरद पवारांनी मला 7 वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या पदातून पण मला आता मुक्त करा आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या,” अशी जाहीर मागणी यावेळी त्यांनी केली. “शेवटी पक्ष शरद पवार यांचा आहे, त्यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.” असेही ते म्हणाले.

जयंत पाटील यांनी पुण्यातील बालगंधर्व येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची आणि युवांना संधी देण्याची जाहीर मागणी केली. यावेळी त्यांनी असे म्हणताच संपूर्ण सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या काही काळापासून चांगलेच चर्चेत राहिले आहेत. अनेकदा ते पक्षात नाराज असून भाजपमध्ये पक्ष सोडून प्रवेश करतील असा चर्चा रंगल्या होत्या. पण, त्या सर्व चर्चा खोट्या असल्याचे त्यांनी स्वतः पुढे येऊन सांगितले होते. तसेच, जयंत पाटील यांच्या पक्षातील भूमिकेवरून युवा आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले होते. जयंत पाटील यांनी पक्षात संघटनात्मक फेरबदल करताना अनेक महत्त्वाची पदं आपल्या विश्वासू आणि निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे पक्षातील इतर अनुभवी, कार्यक्षम आणि निष्ठावान लोकांना संधी मिळत नसल्याचे मत नाराज आमदारांनी केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता स्वतः जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.

Jayant Patil जयंत पाटील यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

भाषणाच्या सुरुवातीला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

निवेदकाने जयंत पाटील यांचे कौतुक करताना, जिथे जयंत पाटील असतात तिथे जास्त बोलायचे नसते असे विधान केले. त्यानंतर जयंत पाटील यांनी हा जॅकेटवाला आहे, असे म्हणून अजित पवार यांना टोला लगावला.

सुप्रिया सुळे यांनी भारताची बाजू मांडली. त्यांचे अभिनंदन. आपले पक्षीय मदभेद असतील मात्र परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो तेव्हा या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते. त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि शरद पवारांनी आम्हा सगळ्यांना सांगितलेले आहे की देश हिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे.

आपल्याला विधानसभेत निराशजनक पराभवाला सामोरे जावे लागेल. महाविकास आघाडी निवडून येईल 11 कोटी जनतेला अपेक्षा होती, पण निकाल वेगळे लागले.

इतर जण निवडणूक आयोगाऐवजी खुलासे करत आहेत, पूर्वी निवडणूक आयोगाच्या नियुक्तीत सरन्यायाधीश सहभागी असायचे. पण त्यांना प्रक्रियेतून बाजूला करण्यात आले. लोकसभला 85 मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रभाव होता. तिथे महायुतीच्या जागा निवडून आल्या.

2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यावर बरेच जण त्यांच्या रेल्वेत बसायला लागले. परंतु, अनेकजण शरद पवार यांच्यासोबत राहिले. संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व असते. शरद पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे दिली, हा माझ्यासाठी मोठा क्षण होता.

आपली लढाई सीबीआय, ईडी आणि सीबीआय सोबत आहे. पुलवामंतर फक्त 4 खासदार निवडून आले. शरद पवार यांना ईडने नोटीस दिली. यानंतर शरद पवार यांनी स्वतः सांगितले, मीच येतो. मग लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. वातावरण ढवळून निघाले.

2019 मध्ये 54 जागा मिळाल्या. नंतर शरद पवार किमायने सत्तेत गेलो. सर्व गोष्टी त्याग करत, एकत्रित राहण्याचा प्रयत्न केला. आरोग्यमंत्री म्हणून कोरोना काळात राजेश टोपे यांनी चांगले काम केले.

पक्ष फुटल्यानंतर 8 जागा निवडून आल्या. आमचे 9 खासदार निवडून आले असते. शशिकांत शिंदे निवडून आले असते, पण तुतारी आणि पिनाणीच्या घोळामुळे त्यांचा पराभव झाला.

विधानसभेला आपला पराभव झाला. मात्र, बऱ्याच ठिकाणी आमचे उमेदवारांचा पराभव झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष सत्तारूढ पक्षाने फोडलं.

शिवभोजन थाळीने अनेकांना तारले तीच बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. विधिमंडळ एक कमिटी धुळ्यात गेली तेव्हा एका आमदाराच्या स्वीय सहायकाकडे 2 कोटी रुपये सापडले. अजूनही शरद पवार यांना टीकेचे धनी केले जाते. म्हणजे अजूनही शरद पवार यांची भीती कायम आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img