हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपुरात पुन्हा (Manipur Violence) एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मैतेई समाजातील काही नेत्यांना अटक झाली. यानंतर ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने सुरू झाली आहेत. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने राज्यातील पाच जिल्ह्यांत पाच दिवसांसाठी इंटरनेट बंद केले आहे. या जिल्ह्यात गर्दी जमवण्यावरही मनाई आहे.
राजधामी इंफाळ भागात शनिवारी मैतेई समूहाचे पाच अरमबाई टेंगोल स्वयंसेवकांना अटक करण्यात आल्याची अफवा पसरली. यानंतर लगेचच तणाव वाढला. लोकांनी आंदोलन सुरू केले. याच दरम्यान पोलीस आणि आंदोलकांत धुमश्चक्री उडाली. या घडामोडींवर मणिपूर प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळेही राज्यातील तणावात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.