26 C
New York

Uddhav Thackeray : मागेपुढे ठुमके देत नाचण्याशिवाय… ठाकरेंची महाजनांवर जहरी टीका

Published:

भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख सध्याच्या राजकारणात ‘नाच्या’ असा केला जातो आणि ते खरे असावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागेपुढे ठुमके देत नाचण्याशिवाय या माणसाचे तसे कर्तृत्व नाही. हे महाशय ज्या जामनेर मतदारसंघात निवडून येतात तो संपूर्ण भाग आजही भकास आणि स्मशानासारखा आहे. लोकांना किमान नागरी सुविधा तेथे उपलब्ध नाहीत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाजन हे ‘जेमतेम’ मताधिक्याने निवडून आले. मतदार यादीतली हेराफेरी, पैशांचे प्रचंड वाटप यामुळे त्यांना निसटता विजय मिळाला, अशी जहरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

मते विकत घेणे, इतरांचे निवडून आलेले लोक विकत घेणे हा गिरीश महाजन यांचा धंदा आहे आणि त्यांचे इतर अवांतर धंदे तसेच छंद काय आहेत, याबाबत सन्माननीय एकनाथ खडसे यांनी वारंवार प्रकाशझोत टाकला आहे. आर्थिक घोटाळे, बँका, जमिनी हडपणे, पतपेढ्यांतील अफरातफर, टेंडरबाजी, दलाली यातूनमहाजन यांनी हजारो कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली आणि आपल्या अवतीभोवती अशाच दलालांचे जाळे निर्माण केले. यातून त्यांना एक नशा चढली आहे, पण हा माणूस एक नंबरचा डरपोक आणि पळपुटा आहे, अशी टीकाही उद्ध ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करू, अशी मस्तवाल भाषा भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. सत्तेवरचा माणूस मदांध झाला की काय होते, त्याचा उत्तम नमुना म्हणजे हे महाजन. शिवसेना जमीनदोस्त करण्याच्या वल्गना गेल्या पन्नास वर्षांत महाजनांसारख्या अनेकांनी केल्या. शिवसेना म्हणजे फक्त खासदार, आमदार, नगरसेवक असा विकाऊ माल नाही. शिवसेना हे एक विचाराने पुढे जाणारे संघटन आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

निवडणुका येतात- जातात. आमदार, खासदार वगैरे लोकही प्रवाहपतित होतात, पण शिवसेना आहे आणि राहणारच. ज्यांना शिवसेनेने नाव, रूप, प्रतिष्ठा, ताकद दिली अशा अनेकांना कधी काँग्रेसने, कधी राष्ट्रवादी काँग्रेसने, तर कधी सध्याच्या भारतीय जनता पक्षाने मोहात पाडून विकत घेतले. तरीही शिवसेना आहेच आणि राहील. महाजनसारख्यांना ‘शिवसेना संपवू, जमीनदोस्त करू’ खरे म्हणजे अशी ‘आपटाआपटी’रोज करावी लागते यातच शिवसेनेच्या ताकदीची कल्पना येते, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img