35.3 C
New York

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनची तुफानी एन्ट्री, पुढील तीन दिवस कशी असणार परिस्थिती?

Published:

जून महिन्यात हजेरी लावणाऱ्या मान्सूनने (Maharashtra Rain) यंदाच्या वर्षी तब्बल 12 दिवस आधीच हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून रविवारी (ता. 25 मे) महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्यातील अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर सोमवारी (ता. 26 मे) मुंबईतही मान्सूनने हजेरी लावली असल्याची घोषणा करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. (Maharashtra Rain state was drenched in first rain, what will situation be like for next three days)

मंगळवारी (ता. 27 मे) कोकण आणि मुंबईला हवामान विभागाकडून ऑरेंट अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, रायगड, कोकण या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर उर्वरित राज्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी (ता. 28 मे) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या भागाला ऑरेंट अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे.

तर, 29 आणि 30 मे रोजी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाकडून 29 मे रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, त्याशिवाय कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, 30 मे रोजी विदर्भ, रायगड, ठाणे या भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागासोबत प्रशासनाकडून सुद्धा करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img