15.9 C
New York

Rain alert : पुढील 36 तास धोक्याचे, हवामान विभागाने दिला हा इशारा

Published:

गेल्या काही दिवसांपासून पूर्वमान्सून पावसाने महाराष्ट्रात अनेक भागांना झोडपले आहे. (Rain alert) मे महिन्यात सुरू असलेल्या या अवकाळी पावसाने सामन्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याचेदेखील समोर आले आहे. गेल्या 24 तासांपासूनच महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये समुद्रात सुरू असणाऱ्या अनेक हालचाली पाहता त्याचा थेट परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे. असे असताना हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणासह गुजरातपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच पुढील 36 धोक्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे. (Rain Update in Maharashtra cyclone like conditions to be form in arabian sea red alert in this area)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वादळ तयार होण्याची शक्यता आहे. तसेच, शुक्रवारी (23 मे) सकाळी केलेल्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले ते येत्या 36 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे नाव देण्यात आले असून त्याची पुढील वाटचाल उत्तरेकडे असणार आहे. या चक्रीवादळामुळे मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्याच्या रायगड आणि रत्नागिरी भागाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात सोसाट्याचा वारा वाहणार असून या वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या घाटमाथ्यावरील भागामध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. तसेच, पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती संकटांमध्ये भर टाकू शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img