राज्यात सध्या अवकाळी पाऊस जोरात (Maharashtra Weather Update) सुरू आहे. या पावसामुळे उकाडा कमी झाला आहे. मात्र शेती पिकांचे मोठे नुकसान झाला आहे. त्यातच आता राज्यात नेहमीपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून दाखल (Monsoon) होणार असल्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत राज्यात अवकाळीचा मुक्कामही (Unseasonal Rain) कायम राहणार आहे. हवामान विभागाने राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
Unseasonal Rain अंदमानात मान्सूनची एन्ट्री
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालं आहे. या ठिकाणी सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. मान्सून अंदमानात नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच दाखल झाला आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबारसह मध्य बंगालच्या उपसागरात पुढील काही दिवसात विस्तार करेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. केरळ आणि महाराष्ट्राकडे यानंतर हळूहळू मान्सून वाटचाल सुरू करील अशी शक्यता आहे.